शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

बेलगावात डेंग्यूचे २५ रुग्ण

By admin | Updated: August 26, 2014 23:20 IST

तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा

गावात भीतीचे वातावरणब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले असून यातील काही रुग्ण पॉझेटिव्ह असल्याचे समजते. काही रुग्णांनी शहरातील खासगी डॉक्टरकडेही उपचार सुरु केले आहे. गावात धुरफवारणी करण्यात आली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.ब्रह्मपुरीपासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या बेलगावात घाणीचे साम्राज्य आहे. गावात मागील काही दिवसांपासून रुग्ण तापाने फणफणत आहे. काही रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. काही रुग्णांनी अऱ्हेरनवरगाव प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु केला आहे. दरम्यान गावातील हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान नागपूर येथे तिचा मृत्यू झाला.यामुळे गावात अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाने गावातील २७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. यातील २ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले तर याच गावातील ११ रुग्ण ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात ऋतुजा बोरकर, रिचा बोरकर, शुभांगी बोरकर या एकाच घरातील तिन सदस्यांवर उपचार सुरु आहे. पायल डोमा वासनिक, मंगेश अशोक मेश्राम, दिपा केवळ मेश्राम, सुहास अनिल बोरकर, उज्ज्वला अनिल बोरकर, राजनंदनी जयपाल बोरकर, सुनिता जयपाल बोरकर आदी ग्र्रामस्थ मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात प्रचंड प्रमाणात घाण साचली आहे. येथे शासनाने शौचलय बांधून दिले आहे. यातील काही शौचालय कागदोपत्री आहे. त्यामुळे नागरिक शौचास उघड्यावर जातात. तसेच नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यानेही ठिकठिकाणी पाणी जमा होत आहे. त्यामुळे गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे. दररोज डेंग्यू व इतर तापांनी रुग्ण बेजार झाले आहेत. गावामध्ये किटकनाशक फवारणी केली जात असली तरी पाहिजे तशी स्वच्छता नसल्यानेच आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी आजाराविषयी ग्रामसभेत माहिती दिली. स्थानिक प्रशासनाने थातूरमातूर उपचार केला. मात्र गावात स्वच्छता मोहीम राबविली नसल्यानेच आज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. शासकीय वैद्यकीय सुविधा व गावातील भितीचे असलेले वातवरण दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)