शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नळाला २४ तास मुबलक पाणी !

By admin | Updated: June 16, 2016 01:39 IST

संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे.

नागरिक समाधानी : चिरादेवी ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्शभद्रावती : संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे. येथील सरपंच वासुदेव ठाकरे यांनी घरातील प्रत्येक नळाला २४ तास पाणी देऊन नियंत्रणासाठी मीटर बसविले. हा प्रयोग जिल्ह्यातील एकमेव आहे.तालुक्यातील चिरादेवी हे गाव ८०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील सरपंच हे शिवसेना पक्षाशी निगडीत असून दोन पंचवार्षिकमध्ये निवडून सरपंच या पदावर आहे. त्यासोबतच त्यांची पत्नी जयश्री ठाकरे यादेखील ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावातील विकास म्हणजे प्रत्येक नागरिकांचा विकास हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलि प्रशासन, आमदार फंड, खासदार फंड मिळेल त्या फंडातून गावाच्या विकासाला महत्त्व दिले. पूर्वी या गावात पाण्याची भीषण टंचाई होती. परंतु आज या गावाची पाण्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळख आहे. या गावातील ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अवघ्या एका वर्षात बांधून संपूर्ण गावाची तहान भागवली. गावकऱ्यांना दोन वेळेस मूबलक पाणी मिळायला लागले. आता २४ तास गावकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. यासाठी १३० नळजोडणी देण्यात आली असून त्यावर मीटर बसविण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ १ जूनला करण्यात आला. गावातील नागरिक पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करेल, पाण्याचा अपव्यय होणार नाही, जर कोणी अपव्यय केला तर त्याला मीटर रिडींगप्रमाणे आर्थिक भुर्दंड भरावे लागेल. या योजनेचे संपूर्ण गावासह तालुक्यातसुद्धा स्वागत करण्यात आले.गावातील काही नागरिकांकडे खासगी बोअरवेल आहे. काही निकामी झाल्या आहेत. अशाकडे कनेक्शन देणे चालु आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण गावकऱ्यांना मिळणार असल्याचे वासुदेव ठाकरे यांनी सांगितले. या चिरादेवी गावाची विकासाकडे वाटचाल सुरू असून येथील विजेचा लंपडाव लक्षात घेता गावातील चौकाचौकात सौर ऊर्जेवर चालणारे ४० पथदिवे लावण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीत सिमेंट रस्ते, रस्त्यांच्या कडेला कडूलिंब व निलगिरी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. येथील ९८ टक्के नागरिकांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधले असून १०० टक्के हागणदारीमुक्त गाव आहे. आता या गावातील प्राथमिक शाळेत ई-लर्निंग सुरू झाले असून ही शाळा अत्याधुनिक करण्याचे कार्य सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)