शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

नळाला २४ तास मुबलक पाणी !

By admin | Updated: June 16, 2016 01:39 IST

संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे.

नागरिक समाधानी : चिरादेवी ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्शभद्रावती : संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे. येथील सरपंच वासुदेव ठाकरे यांनी घरातील प्रत्येक नळाला २४ तास पाणी देऊन नियंत्रणासाठी मीटर बसविले. हा प्रयोग जिल्ह्यातील एकमेव आहे.तालुक्यातील चिरादेवी हे गाव ८०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील सरपंच हे शिवसेना पक्षाशी निगडीत असून दोन पंचवार्षिकमध्ये निवडून सरपंच या पदावर आहे. त्यासोबतच त्यांची पत्नी जयश्री ठाकरे यादेखील ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावातील विकास म्हणजे प्रत्येक नागरिकांचा विकास हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलि प्रशासन, आमदार फंड, खासदार फंड मिळेल त्या फंडातून गावाच्या विकासाला महत्त्व दिले. पूर्वी या गावात पाण्याची भीषण टंचाई होती. परंतु आज या गावाची पाण्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळख आहे. या गावातील ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अवघ्या एका वर्षात बांधून संपूर्ण गावाची तहान भागवली. गावकऱ्यांना दोन वेळेस मूबलक पाणी मिळायला लागले. आता २४ तास गावकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. यासाठी १३० नळजोडणी देण्यात आली असून त्यावर मीटर बसविण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ १ जूनला करण्यात आला. गावातील नागरिक पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करेल, पाण्याचा अपव्यय होणार नाही, जर कोणी अपव्यय केला तर त्याला मीटर रिडींगप्रमाणे आर्थिक भुर्दंड भरावे लागेल. या योजनेचे संपूर्ण गावासह तालुक्यातसुद्धा स्वागत करण्यात आले.गावातील काही नागरिकांकडे खासगी बोअरवेल आहे. काही निकामी झाल्या आहेत. अशाकडे कनेक्शन देणे चालु आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण गावकऱ्यांना मिळणार असल्याचे वासुदेव ठाकरे यांनी सांगितले. या चिरादेवी गावाची विकासाकडे वाटचाल सुरू असून येथील विजेचा लंपडाव लक्षात घेता गावातील चौकाचौकात सौर ऊर्जेवर चालणारे ४० पथदिवे लावण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीत सिमेंट रस्ते, रस्त्यांच्या कडेला कडूलिंब व निलगिरी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. येथील ९८ टक्के नागरिकांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधले असून १०० टक्के हागणदारीमुक्त गाव आहे. आता या गावातील प्राथमिक शाळेत ई-लर्निंग सुरू झाले असून ही शाळा अत्याधुनिक करण्याचे कार्य सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)