शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

नळाला २४ तास मुबलक पाणी !

By admin | Updated: June 16, 2016 01:39 IST

संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे.

नागरिक समाधानी : चिरादेवी ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्शभद्रावती : संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे. येथील सरपंच वासुदेव ठाकरे यांनी घरातील प्रत्येक नळाला २४ तास पाणी देऊन नियंत्रणासाठी मीटर बसविले. हा प्रयोग जिल्ह्यातील एकमेव आहे.तालुक्यातील चिरादेवी हे गाव ८०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील सरपंच हे शिवसेना पक्षाशी निगडीत असून दोन पंचवार्षिकमध्ये निवडून सरपंच या पदावर आहे. त्यासोबतच त्यांची पत्नी जयश्री ठाकरे यादेखील ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावातील विकास म्हणजे प्रत्येक नागरिकांचा विकास हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलि प्रशासन, आमदार फंड, खासदार फंड मिळेल त्या फंडातून गावाच्या विकासाला महत्त्व दिले. पूर्वी या गावात पाण्याची भीषण टंचाई होती. परंतु आज या गावाची पाण्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळख आहे. या गावातील ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अवघ्या एका वर्षात बांधून संपूर्ण गावाची तहान भागवली. गावकऱ्यांना दोन वेळेस मूबलक पाणी मिळायला लागले. आता २४ तास गावकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. यासाठी १३० नळजोडणी देण्यात आली असून त्यावर मीटर बसविण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ १ जूनला करण्यात आला. गावातील नागरिक पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करेल, पाण्याचा अपव्यय होणार नाही, जर कोणी अपव्यय केला तर त्याला मीटर रिडींगप्रमाणे आर्थिक भुर्दंड भरावे लागेल. या योजनेचे संपूर्ण गावासह तालुक्यातसुद्धा स्वागत करण्यात आले.गावातील काही नागरिकांकडे खासगी बोअरवेल आहे. काही निकामी झाल्या आहेत. अशाकडे कनेक्शन देणे चालु आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण गावकऱ्यांना मिळणार असल्याचे वासुदेव ठाकरे यांनी सांगितले. या चिरादेवी गावाची विकासाकडे वाटचाल सुरू असून येथील विजेचा लंपडाव लक्षात घेता गावातील चौकाचौकात सौर ऊर्जेवर चालणारे ४० पथदिवे लावण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीत सिमेंट रस्ते, रस्त्यांच्या कडेला कडूलिंब व निलगिरी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. येथील ९८ टक्के नागरिकांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधले असून १०० टक्के हागणदारीमुक्त गाव आहे. आता या गावातील प्राथमिक शाळेत ई-लर्निंग सुरू झाले असून ही शाळा अत्याधुनिक करण्याचे कार्य सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)