शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जातून २४ शेतकऱ्यांची मुक्तता

By admin | Updated: September 25, 2015 01:25 IST

नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती.

दुसऱ्या बैठकीत निर्णय : नागभीड तालुक्यातील ३१ प्रकरणांवर होणार कार्यवाहीचंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. ३० जूनपर्यंत अहवाल सादर करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सावकरी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव येत असून जिल्हास्तरीय समितीने दोन बैठकात २४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव निकाली काढले असून ४ लाख ६० हजार २५५ रूपयाचे कर्ज माफ केले आहे. यात सिंदेवाही, भद्रावती व मूल तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव नुकतेच जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत.सावकरी कर्जमाफीचे प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर झाल्यानंतर ही समिती अभिप्राय देऊन जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवित असते. त्यानंतर त्या प्रस्तावावर चर्चा होऊन प्रस्ताव निकाली काढले जाते. जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत सिंदेवाही तालुक्यातील १६, भद्रावती तालुक्यातील ४ व मूल तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले. या शेतकऱ्यांवर ४ लाख ६० हजार २५५ रूपयाचे कर्ज होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या दुसऱ्या सभेत २४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यात सिंदेवाही तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचे १ लाख ५४ हजार ७८२ रूपये, भद्रावती तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे २ लाख ६३ हजार ९९७ रूपये व मूल तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ४ शेतकऱ्यांचे ४१ हजार ५७६ रूपयाचे कर्ज माफ करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सावकारी कर्ज घेणारे जे शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरणार आहेत, अशा शेतकऱ्यांचा अहवाल तालुका उपनिबंधकाकडे सादर करायचा होता. मात्र अनेक सावकारांनी अहवाल सहकार विभागाकडे सादर करण्यास दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात याचिका दाखल असल्याने सावकारांवरही दडपण आणता येऊ शकत नाही. तर कर्जमाफीसाठी शासनाने काही अटी घातल्याने ही प्रक्रीया लांबणीवर जात आहे.हिवाळी अधिवेशन काळात कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याचा अद्यादेश राज्य शासनाने काढला. ३० जूनपुर्वीच कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात मात्र या निर्णयाची अंमलबजावनीच झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आजही कर्ज आहे. तर नुकतेच नागभीड तालुक्यातील ३१ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे आले असून समितीची लवकरच बैठक घेऊन नवीव प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था कार्यालयाने दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)