शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे २४ कोटी रुपये थकीत

By admin | Updated: December 24, 2014 22:56 IST

नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने

३५ नळयोजना : कसे मिळणार नागरिकांना सुरळीत पाणी ?चंद्रपूर : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांकडून पाणी पट्टी कर वसुल न केल्याने तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यामुळे या योजनेला आता अखेरची घरघर आली आहे. योजना सुरु ठेवण्यासाठी पाणीपट्टी कर वसूल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी तशा सूचनाही दिल्या आहे.बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, काही सदस्यांना सभागृहात गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी बोगस ठराव घेऊन मंजुरी मिळवित असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी केला. तर लघु पाटबंधारे जिल्हा परिषद चंद्रपूर हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या अखत्यारित येत असल्याने यापुढे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हा विभाग जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला जोडण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून जिल्हा परिषद सदस्य अहिरकर यांनी आक्षेप घेत निषेध नोंदविला. जिल्ह्यात ३५ नळयोजनेंतर्गंत २५० गावांना पाणी पुरवठा केला जातो. या माध्यमातून घराघरोत पाणी पोहचविण्यात येत आहे. मात्र यातील अनेक गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा योजनेतील पाणी पट्टी कर भरलाच नसल्याने अनेक योजना थंडबस्त्यात पडल्या आहे. लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी तथा पाणी समितीनेही पाणी पट्टीकर वसुल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नळयोजनेपोटी आजपर्यंत तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांनी सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रश्न उपस्थित केला. (नगर प्रतिनिधी)