३५ नळयोजना : कसे मिळणार नागरिकांना सुरळीत पाणी ?चंद्रपूर : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांकडून पाणी पट्टी कर वसुल न केल्याने तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यामुळे या योजनेला आता अखेरची घरघर आली आहे. योजना सुरु ठेवण्यासाठी पाणीपट्टी कर वसूल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी तशा सूचनाही दिल्या आहे.बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, काही सदस्यांना सभागृहात गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी बोगस ठराव घेऊन मंजुरी मिळवित असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी केला. तर लघु पाटबंधारे जिल्हा परिषद चंद्रपूर हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या अखत्यारित येत असल्याने यापुढे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हा विभाग जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला जोडण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून जिल्हा परिषद सदस्य अहिरकर यांनी आक्षेप घेत निषेध नोंदविला. जिल्ह्यात ३५ नळयोजनेंतर्गंत २५० गावांना पाणी पुरवठा केला जातो. या माध्यमातून घराघरोत पाणी पोहचविण्यात येत आहे. मात्र यातील अनेक गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा योजनेतील पाणी पट्टी कर भरलाच नसल्याने अनेक योजना थंडबस्त्यात पडल्या आहे. लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी तथा पाणी समितीनेही पाणी पट्टीकर वसुल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नळयोजनेपोटी आजपर्यंत तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांनी सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रश्न उपस्थित केला. (नगर प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्याचे २४ कोटी रुपये थकीत
By admin | Updated: December 24, 2014 22:56 IST