शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

पाणी पुरवठ्याचे २४ कोटी रुपये थकीत

By admin | Updated: December 24, 2014 22:56 IST

नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने

३५ नळयोजना : कसे मिळणार नागरिकांना सुरळीत पाणी ?चंद्रपूर : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांकडून पाणी पट्टी कर वसुल न केल्याने तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यामुळे या योजनेला आता अखेरची घरघर आली आहे. योजना सुरु ठेवण्यासाठी पाणीपट्टी कर वसूल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी तशा सूचनाही दिल्या आहे.बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, काही सदस्यांना सभागृहात गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी बोगस ठराव घेऊन मंजुरी मिळवित असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी केला. तर लघु पाटबंधारे जिल्हा परिषद चंद्रपूर हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या अखत्यारित येत असल्याने यापुढे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हा विभाग जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला जोडण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून जिल्हा परिषद सदस्य अहिरकर यांनी आक्षेप घेत निषेध नोंदविला. जिल्ह्यात ३५ नळयोजनेंतर्गंत २५० गावांना पाणी पुरवठा केला जातो. या माध्यमातून घराघरोत पाणी पोहचविण्यात येत आहे. मात्र यातील अनेक गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा योजनेतील पाणी पट्टी कर भरलाच नसल्याने अनेक योजना थंडबस्त्यात पडल्या आहे. लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी तथा पाणी समितीनेही पाणी पट्टीकर वसुल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नळयोजनेपोटी आजपर्यंत तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांनी सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रश्न उपस्थित केला. (नगर प्रतिनिधी)