शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या

जागतिक शौचालय दिन : शौचालय बांधकाम करून वापर केल्यास सुटणार आरोग्याच्या समस्यासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरदेशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होतो. तो टाळण्यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूभाव होतो. प्र्रत्येकांनी शौचालयाचा वापर केल्यास विविध रोगांपासून मुक्ती मिळू शकते. मात्र त्यासाठी स्वत:ची मानसिकता असणे गरजेचे आहे.यावर्षी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७७ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट हातात घेतले आहे. यातील ६ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापरही नागरिकांनी सुरु केला आहे. शासनस्तरावर शौचालय बांधकाम आणि वापरासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र आजही काही नागरिक शौचालयाच्या बांधकाम आणि वापराबाबत उदासिनता दाखवितात. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र ही संख्या फारच तोकडी आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी एपीलसाठी २ हजार ५९३, बीपीएल २ हजार ३६५, विद्यालय १ हजार ५८६, तर अंगणवाडी केंद्रामध्ये २ हजार २७७ शौचालय बांधण्यात येणार आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील काही परिसरामध्ये शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक गावातील रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. त्यामुळे गावाभोवती, विष्ठा साचते. दररोज कुजणाऱ्या या विष्ठेमधील घातक वायू बाहेर पडतात व ते गावात पसरतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.पशु-पशी व मानवी विष्ठा रोगजंतुच्या अस्तीत्वामुळे अत्यंत घातक असते. त्यामुळे ती ताडबतोड जमिनीमध्ये गाढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र असे न केल्यामुळे रोगांना आमंत्रण मिळते. यामुळेच शौचालयाचा वापर केल्यास यापासून सुटका मिळू शकते. मानवी विष्ठेमध्ये जंताची अंडी तसेच इतर रोगजंतू असतात. ही अंडी शौचाला गेलेल्या माणसाच्या पायाबरोबर, शौचालयाला नेलेल्या पाण्याच्या तांब्याबरोबर तसेच मातीत खेळणाऱ्या मुलांच्या हातापायाला लागतात. लागलेल्या मातीबरोबर पिण्याच्या पाण्यात व अन्नात मिसळतात व ते पोटात गेल्यामुळे मुलांना जंत होतात. त्यामुळे नाहक औषधोपचार करावा लागतो. शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे, हात पाय मोडणे डोक्याला मार लागने असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शौचालयाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. महिलांना दिवसा शौचास जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या पहाटे किंवा रात्री अंधारात शौचास जाणे पसंत करतात. त्यामुळे बराचकाळ विष्ठा पोटात साठून राहते व त्यातील जंत, जिवाणू, विषाणू आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे पोटात दुुखण्यास सुरुवात होते. अपचन होते. विष्ठा पोटात साठण्याने महिलांना नेहमी पोटाचे आजारामध्ये वाढ होते. वाशिम जिल्ह्यातील महिलेने शौचालय बांधकामासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तिच्यासारखीच जिद्द प्रत्येक महिलांनी केली तर, जिल्हा निर्मल होणार हे मात्र नक्की.