शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या

जागतिक शौचालय दिन : शौचालय बांधकाम करून वापर केल्यास सुटणार आरोग्याच्या समस्यासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरदेशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होतो. तो टाळण्यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूभाव होतो. प्र्रत्येकांनी शौचालयाचा वापर केल्यास विविध रोगांपासून मुक्ती मिळू शकते. मात्र त्यासाठी स्वत:ची मानसिकता असणे गरजेचे आहे.यावर्षी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७७ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट हातात घेतले आहे. यातील ६ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापरही नागरिकांनी सुरु केला आहे. शासनस्तरावर शौचालय बांधकाम आणि वापरासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र आजही काही नागरिक शौचालयाच्या बांधकाम आणि वापराबाबत उदासिनता दाखवितात. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र ही संख्या फारच तोकडी आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी एपीलसाठी २ हजार ५९३, बीपीएल २ हजार ३६५, विद्यालय १ हजार ५८६, तर अंगणवाडी केंद्रामध्ये २ हजार २७७ शौचालय बांधण्यात येणार आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील काही परिसरामध्ये शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक गावातील रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. त्यामुळे गावाभोवती, विष्ठा साचते. दररोज कुजणाऱ्या या विष्ठेमधील घातक वायू बाहेर पडतात व ते गावात पसरतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.पशु-पशी व मानवी विष्ठा रोगजंतुच्या अस्तीत्वामुळे अत्यंत घातक असते. त्यामुळे ती ताडबतोड जमिनीमध्ये गाढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र असे न केल्यामुळे रोगांना आमंत्रण मिळते. यामुळेच शौचालयाचा वापर केल्यास यापासून सुटका मिळू शकते. मानवी विष्ठेमध्ये जंताची अंडी तसेच इतर रोगजंतू असतात. ही अंडी शौचाला गेलेल्या माणसाच्या पायाबरोबर, शौचालयाला नेलेल्या पाण्याच्या तांब्याबरोबर तसेच मातीत खेळणाऱ्या मुलांच्या हातापायाला लागतात. लागलेल्या मातीबरोबर पिण्याच्या पाण्यात व अन्नात मिसळतात व ते पोटात गेल्यामुळे मुलांना जंत होतात. त्यामुळे नाहक औषधोपचार करावा लागतो. शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे, हात पाय मोडणे डोक्याला मार लागने असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शौचालयाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. महिलांना दिवसा शौचास जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या पहाटे किंवा रात्री अंधारात शौचास जाणे पसंत करतात. त्यामुळे बराचकाळ विष्ठा पोटात साठून राहते व त्यातील जंत, जिवाणू, विषाणू आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे पोटात दुुखण्यास सुरुवात होते. अपचन होते. विष्ठा पोटात साठण्याने महिलांना नेहमी पोटाचे आजारामध्ये वाढ होते. वाशिम जिल्ह्यातील महिलेने शौचालय बांधकामासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तिच्यासारखीच जिद्द प्रत्येक महिलांनी केली तर, जिल्हा निर्मल होणार हे मात्र नक्की.