शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या

जागतिक शौचालय दिन : शौचालय बांधकाम करून वापर केल्यास सुटणार आरोग्याच्या समस्यासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरदेशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होतो. तो टाळण्यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूभाव होतो. प्र्रत्येकांनी शौचालयाचा वापर केल्यास विविध रोगांपासून मुक्ती मिळू शकते. मात्र त्यासाठी स्वत:ची मानसिकता असणे गरजेचे आहे.यावर्षी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७७ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट हातात घेतले आहे. यातील ६ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापरही नागरिकांनी सुरु केला आहे. शासनस्तरावर शौचालय बांधकाम आणि वापरासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र आजही काही नागरिक शौचालयाच्या बांधकाम आणि वापराबाबत उदासिनता दाखवितात. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र ही संख्या फारच तोकडी आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी एपीलसाठी २ हजार ५९३, बीपीएल २ हजार ३६५, विद्यालय १ हजार ५८६, तर अंगणवाडी केंद्रामध्ये २ हजार २७७ शौचालय बांधण्यात येणार आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील काही परिसरामध्ये शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक गावातील रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. त्यामुळे गावाभोवती, विष्ठा साचते. दररोज कुजणाऱ्या या विष्ठेमधील घातक वायू बाहेर पडतात व ते गावात पसरतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.पशु-पशी व मानवी विष्ठा रोगजंतुच्या अस्तीत्वामुळे अत्यंत घातक असते. त्यामुळे ती ताडबतोड जमिनीमध्ये गाढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र असे न केल्यामुळे रोगांना आमंत्रण मिळते. यामुळेच शौचालयाचा वापर केल्यास यापासून सुटका मिळू शकते. मानवी विष्ठेमध्ये जंताची अंडी तसेच इतर रोगजंतू असतात. ही अंडी शौचाला गेलेल्या माणसाच्या पायाबरोबर, शौचालयाला नेलेल्या पाण्याच्या तांब्याबरोबर तसेच मातीत खेळणाऱ्या मुलांच्या हातापायाला लागतात. लागलेल्या मातीबरोबर पिण्याच्या पाण्यात व अन्नात मिसळतात व ते पोटात गेल्यामुळे मुलांना जंत होतात. त्यामुळे नाहक औषधोपचार करावा लागतो. शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे, हात पाय मोडणे डोक्याला मार लागने असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शौचालयाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. महिलांना दिवसा शौचास जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या पहाटे किंवा रात्री अंधारात शौचास जाणे पसंत करतात. त्यामुळे बराचकाळ विष्ठा पोटात साठून राहते व त्यातील जंत, जिवाणू, विषाणू आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे पोटात दुुखण्यास सुरुवात होते. अपचन होते. विष्ठा पोटात साठण्याने महिलांना नेहमी पोटाचे आजारामध्ये वाढ होते. वाशिम जिल्ह्यातील महिलेने शौचालय बांधकामासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तिच्यासारखीच जिद्द प्रत्येक महिलांनी केली तर, जिल्हा निर्मल होणार हे मात्र नक्की.