शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

२१ व्या शतकातही ग्रामिणांचा नावेतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:57 IST

चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.

ठळक मुद्देराजकीय इच्छाशक्तीचा अभाव : पारडी घाटावरील पूल रखडलेलाच

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.नदीच्या उत्तर भागाला यवतमाळ जिह्यातील वणी व झरी जामणी तर दक्षिण भागाला कोरपना तालुका आहे. या परिसरातील जवळपास ५० ते ६० गावाचा सबंध कोरपना व मुकुटबन बाजारपेठेशी जोडला गेला आहे. या दोन्ही शहराचे येथून अंतर अत्यल्प आहे. परंतु पुलाअभावी हे अंतर अधिक पडत असून नदीला पाणी जास्त असल्यास वेळाबाई मार्गे प्रवास करून सदर शहरे नागरिकांना गाठावी लागत आहे. या पुलाच्या निर्मितीसंदर्भात अनेकदा नागरिकांकडून मागणी करण्यात आली. यावर मंजुरीच्या घोषणासुद्धा प्रसार माध्यमातून झळकल्या. मात्र अद्यापही पुलाचा श्रीगणेशा झाला नाही. त्या कारणाने पूल होणार की नाही, याबाबत नागरिकात संभ्रम कायम आहे. याच नदीवरील या पुलाच्या मागणीनंतर कोडसी (खु), वनोजा व तेलंगणाला जोडणारा दिग्रस पूल हे तयार झाले. मात्र पारडी घाट उपेक्षितच आहे.पूल झाल्यास होऊ शकते औद्योगिक क्रांतीझरी तालुक्यातील मुकुटबन येथे बिरला ग्रुपचा सिमेंट प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त कच्चा माल हा कोरपना भागातच मुबलक उपलब्ध आहे. तेव्हा या घाटावर पूल झाल्यास वाहतूकदृष्ट्या सोयीचे होईल व दोन्ही भागातील गावात औद्योगिक विकास साधला जाईल. शिवाय कोरपना भागातील जनतेला माजरी - आदिलाबाद - नांदेड रेल्वे मार्गावरील मुकुटबन रेल्वे स्थानक प्रवासयोग्य जवळचे रेल्वे स्थानक पडेल.