शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:18 IST

देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : तोहोगाव येथे समस्या निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला गोंडपिपरी पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, जि.प. सदस्य वैष्णवी अमरबोडलावार, सरपंच हंसराज रागीट, उपसभापती वासमवार, महामंत्री खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, तहसीलदार सोनाली मिटकरी, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी ना. हंसराज अहीर यांनी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले. तसा अहवालही सात दिवसात पाठवण्याचे आदेश दिले. यावेळी तोहोगाव ग्रामपंचायतीने १४४ गरजवंतांना घरे मंजूर करून बांधकाम प्रगतीपथावर असल्याने ना. अहीर यांनी सरपंच हंसराज रागीट यांचा गौरव केला. भाजप सरकार सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत. याचा अनेकांना लाभ होत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश उत्तरवार यांनी केले. तर आभार हंसराज रागीट यांनी मानले.