शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:29 IST

५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे ....

ठळक मुद्देदहा ठिकाणी अपक्ष : सेनेला तीन जागा तर इतर सहा जागांवर विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. थेट गावकºयांमधून सरपंचाची ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्येही निकालाची उत्सुकता लागली होती.चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, नागभीड, पोंभूर्णा, राजूरा, कोरपना, जिवती, वरोरा, चिमूर व भद्रावती तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती.मंगळवारी सकाळी १० वाजतापासून तालुका मुख्यालयी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली होती. जवळपास एक ते दीड तासात सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. यामध्ये काँग्रेसला १९ तर भाजपला १८ तसेच शिवसेना तीन, अपक्ष सहा व गोंगपा दोन, शेतकरी संघटना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला.मतदारांनी यशाची सुरूवात गावापासून केली आहे. रेशनवरील रॉकेल आणि साखर बंद करून शासनाने अन्याय केला. त्यामुळे मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारून बदला घेतला आहे.- आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते.राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाचे हे यश आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे. आजपर्यंत इतका निधी इतर पालकमंत्र्यांच्या काळात मिळाला नाही. मागील तीन वर्षात सर्वाधिक निधी जिल्ह्याला मिळाला आहे. केंद्र व राज्यात भक्कम सरकार असून लोकांचा कल भाजपकडे आहे.- हरिश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप