शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यात तीन वर्षात १,८७६ घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST

घनश्याम नवघडे नागभीड : ‘स्वतःचे असावे घरकुल छान’ असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न साकार करण्याची प्रत्येकाची ...

घनश्याम नवघडे

नागभीड : ‘स्वतःचे असावे घरकुल छान’ असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न साकार करण्याची प्रत्येकाची कुवत नसते. अशा व्यक्तींच्या मदतीला शासनाच्या विविध योजना धावून येत असून, या योजनांच्या माध्यमातून घरकुलाची स्वप्नपूर्ती होत आहे. गेल्या तीन वर्षात नागभीड तालुक्यात अशाप्रकारे १८७६ व्यक्तींची स्वप्नपूर्ती झाली आहे.

तालुक्यात घरकुलांची कामे बऱ्यापैकी होत आहेत. नागभीड तालुक्यास गेल्या तीन वर्षात २६०२ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १८७६ घरकुल पूर्ण झाल्याची माहिती आहे. उर्वरित अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. रेतीची टंचाई नसती तर या घरकुलांमध्ये आणखी भर पडली असती.

२०२२ पर्यंत कुणीही बेघर राहू नये, असे शासनाचे धोरण असून त्यादृष्टीने शासनाचे नियोजन सुरू आहे. यासाठी शासनस्तरावर घरकुल योजनेवर मोठ्या प्रमाणावर जोर देणे सुरू आहे. सध्या पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना आणि रमाई घरकुल योजना या तीन योजनांमार्फत घरकुल योजनांचे काम सुरू आहे. नागभीड तालुक्यात या घरकुलाची कामे या योजनांमार्फत सुरू आहेत.

माहितीनुसार नागभीड पंचायत समितीअंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेचे २०१६-१७ मध्ये ५०६ घरकुलांचे नागभीड पंचायत समितीस उद्दिष्ट होते. यापैकी ४९१ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.२०१७-१८ मध्ये २९० घरकुलांपैकी २८३, २०१८-१९ मध्ये १५३ पैकी १४१ तर २०१९-२० मध्ये ७६४ पैकी ४६१ घरकुल पूर्ण झाले आहेत. शबरी घरकुल योजनेत २०१६-१७ ते २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये २३६ घरकुलांचे लक्ष्य होते. यापैकी ११४ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. रमाई घरकुल योजनेत २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात ६५३ घरकुलांचे लक्ष्य या पंचायत समितीला प्राप्त झाले होते. या लक्ष्यापैकी ३८६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. एवढेच नाही तर अनेक घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. काही घरकुल स्लॅब लेव्हल तर काहींचे स्लॅबचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.

बाँक्स

पाच ब्रास रेतीचा निर्णय कुचकामी

प्रत्येक घरकुल लाभार्थ्यास पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्यंतरी शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाची तालुक्यात अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली तर घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र संबंधित पातळ्यावरून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. संबंधितांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.