शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

१८ दिवसांपासून २८ जनावरे चारा-पाण्याविना कोंडवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:20 IST

मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.

ठळक मुद्देएका गाईची मृत्यू : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी: मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.१ आॅगस्टला जनावरांची तस्कारी करत असताना कोठारीचे ठाणेदार संतोष अंबीके यांनी २८ जनावरांना वाहनासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात रवानगी केली. कोंडवाड्यातील बंदीस्त जनावरांच्या देखभालीसाठी चारा पाण्याची व्यवस्था करणे ग्रा.पं. प्रशासनाचे कर्तव्यच आहे. पण याकडे कानाडोळा करण्यात आला. कोंडवाड्यात चिखलाचे साम्राज्य पसरले. जनावरांना बसण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने उभे राहावे लागते. चारापाणी न दिल्याने ही जनावरे अशक्त झाली आहेत. चिखलामुळे जनावरांना जखमा झाल्या. शुक्रवारी कोंडवाड्यातच एकाचा मृत्यू झाला. तरीही ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दरम्यान हा प्रकार येथील जागरूक नागरिक आशिष भरारकर, इरफान शेख, दिनेश पेरगुलवार यांच्या लक्षात आल्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. मात्र त्यानंतरही स्वच्छता व चारा, पाण्याची व्यवस्था तसेच पशु वैद्यकीय अधिकाºयांकडून उपचार करण्यात आले नाही. कोंडवाड्यातील या जनावरांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे.तातडीने चारा आणि औषधोपचार केला नाही तर मुकी जनावरे केव्हाही प्राण सोडू शकतात. त्यामुळे गावकºयांमध्ये ग्रापं प्रशासनाविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.कोंडवाड्यात बंदीस्त जनावरांना चारा-पाणी व आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मरसासन्न अवस्थेत आहेत. काहींची स्थिती तर अत्यंत नाजूक आहे. कोंडवाड्यात प्रचंड घाण आहे. बसण्यासाठी योग्य जागा नाही. जनावरे रात्रंदिवस उभी राहतात. त्यांची शारीरिक स्थिती खालावली आहे. ग्रा.पं. प्रशासनाच्या चुकीमुळे ही परिस्थिती जनावरांवर ओढवली आहे.-आशिष भटारकर, सामाजिक कार्यकर्ता, कोठारीपोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. यातील काही जनावरे आधीच आजारी होती. कोंडवाड्याची क्षमताही कमी आहे. पण विशेष काळजी घेणे सुरू आहे.- एल. वाय. पोहरे, ग्रामविकास अधिकारी, कोठारी