शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

१७५ जणांचे बळी गेले; आणखी किती जाऊ द्यायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे  बळी जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगाव यांनी गुरुवारी राकाँचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी दहेगावकर यांनी केली. ऊर्जानगर कॉलनी व दुर्गापुरातील घटनांचीही माहिती दिली. दरम्यान, सर्व बाबींचा लवकरच आढावा घेणार असल्याची ग्वाही खासदार पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली. मात्र, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना वाढल्या. मागील सहा वर्षांत १७५ जणांचे बळी  गेल्याने आणखी जाऊ द्यायचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले. सन २०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला. २०१५ मध्ये ८, २०१६ मध्ये १७, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये २५, २०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाघांमुळे १२२, तर इतर प्राण्यांमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातच ३५ आणि प्रादेशिक वनक्षेत्रात १३२ जणांचा मृत्यू झाला होता. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी जाण्याचे दुष्टचक्र २०२२ मध्येही थांबू शकले नाही. किंबहुना ते वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१४ ते २०२१ कालावधीत १७५ जणांचे बळी गेले आहेत.  उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात घडू लागला आहे. 

वाघांचाही मृत्यू२०१४ ते २०२१ सात वर्षात नैसर्गिक, अपघात व शिकार अशा घटनांमध्ये  ६४ वाघांचाही मृत्यू झाला. नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ, अपघातात ११ वाघ, आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१९ आणि २०२०  या दोन वर्षांत शिकारीमुळे १० वाघांचा मृत्यू म्हणजे वाढत्या संघर्षाचाच परिपाक असू शकतो. 

खा. शरद पवारांचे वेधले लक्ष- चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे  बळी जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगाव यांनी गुरुवारी राकाँचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी दहेगावकर यांनी केली. ऊर्जानगर कॉलनी व दुर्गापुरातील घटनांचीही माहिती दिली. दरम्यान, सर्व बाबींचा लवकरच आढावा घेणार असल्याची ग्वाही खासदार पवार यांनी दिली.

अहवालाची अंमलबजावणी कधी?मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै २०२१ रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी चंद्रपूर  जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी व तज्ज्ञांची बैठक घेऊन सूचना मागविल्या होत्या.  वाघ-बिवट-अस्वल, वन्यजीवांची संख्या, हल्ल्यात मानवी मृत्यू, शेतीचे नुकसान, जंगलतोड, मानवाचा हस्तक्षेप, वाघ, वन्यजीव व मानवाचे अस्तित्व यावर अहवालही तयार झाला. मात्र, मानवी बळी थांबले नाहीत.

 

टॅग्स :TigerवाघSharad Pawarशरद पवार