शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नेत्र शिबिराचा १७२७ रुग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:50 IST

नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, .....

ठळक मुद्देहंसराज अहीर : गावकºयांना उपचार व सेवा मिळण्याकरिता आरोग्य शिबिर आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून नेमके उपचार व्हावेत, हाच या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरामागचा उद्देश असून अशा शिबिराच्या माध्यमातून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील नेत्र रुग्णांना उपचारांतून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्र रुग्णांनी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखावे व अधिकाधिक रुग्णांनी अशा शिबिराचा लाभ घ्यावा. भविष्यात नेत्र तपासणी शिबिराबरोबरच आरोग्य विषयक शिबिराचेही आयोजन करून डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा तालुक्यातील शेगांव (बु) या गावात आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.या शिबिरास माजी मंत्री संजय देवतळे, भाजप विधानसभा प्रमुख विजय राऊत, बाबा भागडे, नगराध्यक्ष अहतेशाम अली, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, ओमप्रकाश मांडवकर, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, पं.स. सभापती रोहिनी देवतळे, नरेंद्र जीवतोडे, उपसभापती विजय आत्राम, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, रमेश मानकर गुरुजी, रवींद्र कष्टी, शुभांगी निंबाळकर, राजू बच्चूवार, जि.प. सदस्य राजू गायकवाड, पं.स. सदस्या तुषार सोमलकर, पं.स. सदस्य रवींद्र धोपटे, पं.स. सदस्य पपिता गुळघाने, जि.प. सदस्य विद्या किन्नाके, पं.स. नारायण कारेकर, पं.स. वंदना दाते आदींची उपस्थिती होती. या शिबिरात २०३५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. यापैकी १७२७ रुग्णांची नेत्र चिकित्सा करुन त्यांना चष्म्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ७० हून अधिक नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. या शिबिरात डॉ. प्रकाश पिल्लई, डॉ. केतन सोनी, डॉ. शमा खान, डॉ. अमित राजा, डॉ. समाधान रांगटे, डॉ. ईश्वर वंजारी, डॉ. दीपक अंबाडे, डॉ. येरमे आदींनी मोलाचे योगदान दिले.याप्रसंगी बोलताना ना. अहीर म्हणाले, ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची उपचाराच्या बाबतीत सातत्याने उपेक्षा आणि हेळसांड होत असते. जवळपास नेत्र विकाराशी संबंधित सुविधांच्या अभावामुळेही ग्रामीण क्षेत्रातील नागरिक डोळ्याच्या विकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपचाराअभावी अंधत्वाचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे चित्र ग्रामीण क्षेत्रात विशेषत्वाने दिसते. या अनुषंगाने ग्रामीण क्षेत्रामध्ये नेत्र चिकित्सा, उपचार व चष्मे वाटप शिबिराच्या आयोजनाचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत ज्या नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आतापर्यंत अशा शिबिराच्या माध्यमातून हजारो नेत्र रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने सामाजिक ऋणाची परतफेड केल्याचा आनंद होतो. यापुढेही अशा शिबिराच्या माध्यमातून नेत्ररुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ना. अहीर यांनी आपल्या मनोगताद्वारे सांगितले.