शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

१७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

By admin | Updated: October 21, 2015 00:55 IST

वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी ...

२ हजार ५०० हेक्टरवर रोपवन लागवड : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींना १ कोटी ७९ लाखांचे अर्थसहाय्यचंद्रपूर : वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या असून वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सन २०१०-११ ते २०१४-१५ या वर्षात १७ हजार ५०४ कुटूंबांना घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे. तर वन्यप्राण्यांच्या हल्यात झालेल्या नुकसानीपोटी चालू वर्षांत एप्रिल ते आॅगष्ट पर्यंत विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य वनविभागातर्फे वितरीत करण्यात आले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत असलेल्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ४३३ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, ग्रामस्थांना सवलतीच्या दरात ७५ टक्के अनुदानावर गेल्या तीन-चार वर्षात शासनाच्या विविध योजनेतून आदिवासी अनुसूचित जमाती इतर प्रवर्गातील कुटुंबांना स्वयंपाक गॅसचे पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची दैनंदिन गरजासाठी वनक्षेत्रात जाणे कमी होत असून काही प्रमाणात वनावरचा ताण कमी होण्यास सहाय्यभूत ठरलेले आहे. त्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण होवून गावकऱ्यांची वन व वन्य प्राण्यांबाबत आस्ता वाढलेली आहे. सन २०१०-११ ते २०१४-१५ पर्यंत एकूण १७ हजार ५०४ कुटूंबाना गॅसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पहिल्या वर्षी १२ सिलिंडर करीता ७५ टक्के अनुदानाचा सुध्दा समावेश आहे.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने सन २०१४-१५ मध्ये ५ हजार १३१ प्रकरणात २ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आलेले आहे. तसेच सन २०१५-१६ मध्ये एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आले आहे. यात मनुष्य हानी, जखमी, पशुधन हानी, शेतपीक हानी, पशुधन जखमी अशा विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. सन २०१५ तेंदू हंगामातंर्गत चंद्रपूर वनवृत्तातील एकूण ७० तेंदू घटक विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ तेंदू घटकाची विक्री झाली आणि ५ कोटी ९० लाख १० हजार रुपये प्राप्त झाले.रोप लागवडीद्वारे १ लाख ३५ हजार दिवस मनुष्य निर्र्मितीसन २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन व विकास परिषद, कॅम्पा व जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट बंधारे, दगडी बंधारे, वनतलाव, गॅबियन व अनघड बंधारे असे एकूण २ हजार ४९० च्या कामास ६ कोटी रुपये निधी खर्च झाला. त्यापासून २ लाख २ हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. सदर कामे पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर पूर्ण झालेले असल्यामुळे वन्यप्राण्यास व वनास त्याचा फायदा होणार आहे. सन २०१५ च्या पावसाळ्यात विविध योजने अंतर्गत एकूण २४५६ हेक्टर क्षेत्रात २३ लाख ४४ हजार रोपांची लागवड करण्यात आलेली असून त्यावर ४ कोटी ३ लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यापासून १ लाख ३५ हजार मनुष्य निर्मिती झाली आहे.