शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

१७ लाख १० हजार व्यक्तींना मिळाले मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना एप्रिल ते नोव्हेंंबर या कालावधीत ...

चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना एप्रिल ते नोव्हेंंबर या कालावधीत मोफत धान्याचा लाभ घेतला. या योजनेमुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले. या कालावधीत उदरनिर्वाहाची सर्व साधने बंद झाली होती. परिणामी, गरीब कुटुंबांसमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे एप्रिल २०२० पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलजावणी सुरू झाली. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिसदस्य ४ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दोन महिन्यात केवळ तांदूळ वितरीत केले होते. त्यानंतर सरकारने निर्णयात बदल करून तांदूळ व डाळीचे वितरण सुरू केले. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात शासनाने निश्चित केलेल्या नियतनानुसार प्रतिसदस्य तीन किलो गहू मोफत, तांदूळ दोन किलो प्रतिसदस्य, चणाडाळ एक किलो प्रतिकार्डधारक मोफत वितरण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

आता उदरनिर्वाहाचे संकट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना गरीबांसाठी उपयुक्त ठरली होती. केंद्र सरकारच्या आदेशानुसार या योजनेची डेडलाईन नोव्हेंंबर महिन्यात संपली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाची साधने अजुनही रूळावर आली नाही. अशा स्थितीत योजना बंद झाल्याने आता उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.

गरीब कुटुंबांमध्ये चिंता

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेपासून गरीब व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबविली होती. कार्ड नसलेल्या गरीब नागरिकांनाही मोफत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढली. मात्र योजना बंद केल्याने चिंता व्यक्त करीत आहेत.