शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

१७ लाख १० हजार व्यक्तींना मिळाले मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना एप्रिल ते नोव्हेंंबर या कालावधीत ...

चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना एप्रिल ते नोव्हेंंबर या कालावधीत मोफत धान्याचा लाभ घेतला. या योजनेमुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले. या कालावधीत उदरनिर्वाहाची सर्व साधने बंद झाली होती. परिणामी, गरीब कुटुंबांसमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे एप्रिल २०२० पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलजावणी सुरू झाली. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिसदस्य ४ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दोन महिन्यात केवळ तांदूळ वितरीत केले होते. त्यानंतर सरकारने निर्णयात बदल करून तांदूळ व डाळीचे वितरण सुरू केले. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात शासनाने निश्चित केलेल्या नियतनानुसार प्रतिसदस्य तीन किलो गहू मोफत, तांदूळ दोन किलो प्रतिसदस्य, चणाडाळ एक किलो प्रतिकार्डधारक मोफत वितरण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १७ लाख २० हजार १८३ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

आता उदरनिर्वाहाचे संकट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना गरीबांसाठी उपयुक्त ठरली होती. केंद्र सरकारच्या आदेशानुसार या योजनेची डेडलाईन नोव्हेंंबर महिन्यात संपली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाची साधने अजुनही रूळावर आली नाही. अशा स्थितीत योजना बंद झाल्याने आता उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.

गरीब कुटुंबांमध्ये चिंता

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेपासून गरीब व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबविली होती. कार्ड नसलेल्या गरीब नागरिकांनाही मोफत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढली. मात्र योजना बंद केल्याने चिंता व्यक्त करीत आहेत.