शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

१५७६ विद्यार्थ्यांना मिळणार खासगी शाळेत मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार ...

आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०२१-२०२२ या सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी मागील आठवड्यापर्यंत शाळांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील १९६ शाळेतील १५७६ जागेसाठी २१ मार्चपर्यंत आरटीई पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

बॉक्स

एकाच टप्प्यात निघणार लॉटरी

नव्या शैक्षणिक सत्राकरिता आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीईअंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतीक्षायादी तयार केली जाईल. लॉटरीतील निवड झालेल्या मुलांनी वेळेवर प्रवेश घेतला नाही तर वेटिंग लिस्टमधील मुलांना प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे.

बॉक्स

मागील वर्षी जागा रिक्त

सन २००९ पासून बालकांना मोफत प्रवेश दिल्या जात आहे. यासाठी हजारो पालक आपल्या पाल्यांचा अर्ज सादर करतात. मात्र शाळा विविध अटी लादत असल्यामुळे अनेकांचा प्रवेश होत नाही. तर अनेक शाळा प्रवेश निश्चित होऊन बालकाला शाळेत प्रवेश देत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक पदे रिक्त राहतात. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. अशा शाळांवर कारवाई करणे, गरजेचे आहे.