शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाणी पुरवठा योजनांसाठी १५० कोटींचा निधी

By admin | Updated: June 16, 2016 01:21 IST

पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री

पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश : बंद योजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवा चंद्रपूर : पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना व जलस्वराज टप्पा दोन मिळून चंद्रपूर जिल्ह्याला १५० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण व बंद पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करुन तातडीने पाठवावेत, यासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जिल्हा परिषदमधील मा.सा. कन्नमवार सभागृहात बुधवारी पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत आढावा सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीवरुन ना. बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. या वर्षी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कृती आराखडा ११ कोटी १८ लक्ष रुपयाचा मंजूर केला होता. त्यामधून १ हजार उपाययोजना ६९० गावात घेण्यात आल्या. यामध्ये ३४५ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या. १५३ योजना दुरुस्ती करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ योजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी १०१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मूल व २४ गावातही ४७ कोटीची योजना व बल्लारपूर येथील हडस्ती व १८ गावातील ४० कोटीच्या योजनेचा समाविष्ट करण्यात आला आहे. जलस्वराज्य २ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ५० योजना घेण्यात आल्या आहेत. सात पेरी अर्बन योजना यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.