शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पाणी पुरवठा योजनांसाठी १५० कोटींचा निधी

By admin | Updated: June 16, 2016 01:21 IST

पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री

पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश : बंद योजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवा चंद्रपूर : पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना व जलस्वराज टप्पा दोन मिळून चंद्रपूर जिल्ह्याला १५० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण व बंद पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करुन तातडीने पाठवावेत, यासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जिल्हा परिषदमधील मा.सा. कन्नमवार सभागृहात बुधवारी पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत आढावा सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीवरुन ना. बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. या वर्षी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कृती आराखडा ११ कोटी १८ लक्ष रुपयाचा मंजूर केला होता. त्यामधून १ हजार उपाययोजना ६९० गावात घेण्यात आल्या. यामध्ये ३४५ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या. १५३ योजना दुरुस्ती करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ योजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी १०१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मूल व २४ गावातही ४७ कोटीची योजना व बल्लारपूर येथील हडस्ती व १८ गावातील ४० कोटीच्या योजनेचा समाविष्ट करण्यात आला आहे. जलस्वराज्य २ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ५० योजना घेण्यात आल्या आहेत. सात पेरी अर्बन योजना यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.