शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

पाणी पुरवठा योजनांसाठी १५० कोटींचा निधी

By admin | Updated: June 16, 2016 01:21 IST

पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री

पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश : बंद योजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवा चंद्रपूर : पाणी टंचाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना व जलस्वराज टप्पा दोन मिळून चंद्रपूर जिल्ह्याला १५० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण व बंद पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करुन तातडीने पाठवावेत, यासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जिल्हा परिषदमधील मा.सा. कन्नमवार सभागृहात बुधवारी पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत आढावा सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीवरुन ना. बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छतेचा आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. या वर्षी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कृती आराखडा ११ कोटी १८ लक्ष रुपयाचा मंजूर केला होता. त्यामधून १ हजार उपाययोजना ६९० गावात घेण्यात आल्या. यामध्ये ३४५ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या. १५३ योजना दुरुस्ती करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७ योजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी १०१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मूल व २४ गावातही ४७ कोटीची योजना व बल्लारपूर येथील हडस्ती व १८ गावातील ४० कोटीच्या योजनेचा समाविष्ट करण्यात आला आहे. जलस्वराज्य २ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ५० योजना घेण्यात आल्या आहेत. सात पेरी अर्बन योजना यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.