शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी शिक्षकांची १५ वर्षांपासून पायपीटच

By admin | Updated: May 15, 2016 00:45 IST

शासनाने कायम विना अनुदानित शाळांची खैरात वाटली. त्यानंतर २० जुलै २००९ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात कायम शब्द वगळला ...

उपासमारीची पाळी : शिक्षणमंत्र्याचे आश्वासन हवेतच विरलेरत्नाकर चटप नांदाफाटाशासनाने कायम विना अनुदानित शाळांची खैरात वाटली. त्यानंतर २० जुलै २००९ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात कायम शब्द वगळला आणि या शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र १५ वर्ष उलटूनही शिक्षक अद्यापही वेतनापासून वंचित असून अनुदानासाठी पायपीट सुरूच आहे. राज्यातील पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक १ हजार ३४२ शाळांना येत्या मे-जूनपासून अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन १० डिसेंबर रोजी शिक्षणमंत्र्यांनी नागपूर येथे शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. आता याबाबत काहीच हालचाली दिसत नसल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल का? अशी भीती निर्माण झाली आहे. राज्यातील ८००० प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न पुढे आवासुन उभा असताना पात्र शाळानाही अनुदान देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याआधीही अनुदानासाठी शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन, मोर्चा, उपोषण, शाळा बंद आंदोलन केले. ९ डिसेंबर रोजी वर्धा ते नागपूर पदयात्रा काढून राज्यातील पाच हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर धडक दिली. मात्र अद्यापही शासन याबाबत पावलं उचलत नसल्याचे दिसते. या आंदोलनादरम्यान सर्व शिक्षक आमदारांना शिक्षक संघटना व कृती समितीला दिलासा दिला. परंतु, अनुदानाचा प्रश्न याही अर्थसंकल्पात कायमच राहिला आहे. गेल्या १५ वर्षांपासून आज ना उद्या वेतन मिळेल, या आशेत कर्मचारी शाळेत काम करीत आहेत. यात संस्थाचालकांना डोनेशनही देण्यात आल्याचे समजते तर काही कर्मचारी बाहेरगावावरून किरायाणे खोली करून वास्तव्यास आले आहेत. मात्र वेतनच मिळत नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न शिक्षकांपुढे आता निर्माण झाला आहे. तर काही शिक्षकांची वयोमर्यादा वाढत असल्याने आर्थिक काळ सेवा करण्याची संधी मिळणार नाही, असे चित्र आहे. विना अनुदानित शाळांमध्ये वेतन मिळत नसल्याने शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. याही परिस्थितीत कुटुंबाचा भार पेलवत शिक्षक प्रामाणिकपणे कामे बजावत आहे. शासनाने शाळांची पाहिजे तशी खैरात वाटली, मात्र अनुदान देण्यास विलंब होत आहे.