शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

१५ वर्षांपासून केवळ आश्वासनेच

By admin | Updated: April 30, 2017 00:32 IST

कोरपना तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा चंद्रपूर-घुग्घुस रस्त्याला जोडणारा भोयगाव रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून अद्यापही दुर्लक्षित आहे.

प्रवासी भोगताहेत नरकयातना : ८५ कोटीची मंजुरी, काम मात्र थंडबस्त्यातनांदाफाटा : कोरपना तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा चंद्रपूर-घुग्घुस रस्त्याला जोडणारा भोयगाव रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून अद्यापही दुर्लक्षित आहे. २५ वर्षापूर्वी सदर मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर भोयगाव पूल ते कवठळ्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग गडचांदूर, भोयगाव, चंद्रपूर असा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्याचबरोबर कोरपना तालुक्यात असलेल्या तीनही सिमेंट प्रकल्पातील चार चाकी, सहा चाकी वाहने याच रस्त्याने ये-जा करीत आहे. जडवाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ-मोठे जीवघेणे खड्डे पडले आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या मागणीसाठी मागील आॅक्टोबर महिण्यात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दोन दिवसापूर्वी सदर रस्त्याच्या बांधकामासाठी ८५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती विविध वृत्तपत्रातून दिली. मात्र या कामाला प्रशासकीय मंजुरी नसल्याचा खुलासा आंदोलनादरम्यान अ‍ॅड. चटप यांनी केला. त्यानंतर फेब्रुवारी महिण्यापर्यंत काम सुरू करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून गेल्या १५ वर्षापासून या मार्गाच्या बांधकामाबाबत आश्वासनेच मिळत असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यामध्ये व्यक्त केल्या जात आहे. भोयगाव मार्गासाठी ८५ कोटीची मंजुरी मिळाल्याचा कांगावा लोकप्रतिनिधींमार्फत केला गेला. तेव्हा रस्त्याचे काम अजूनही थंडबस्त्यातच का, असा सवाल आता नागरिक करीत आहे. प्रवाश्यांना चंद्रपूर-भद्रावती-घुग्घुस जाणे या मार्गाने सोयीचे पडते. त्यामुळे प्रवाशी मोठ्या प्रमाणात गडचांदूर-भोयगाव रस्त्यांनी प्रवास करतात. पावसाळ्यात खड्यामध्ये पाणी साचत असल्याने अनेक अपघातही यापूर्वी या मार्गावर झाले आहे. ज्यात काहींना मृत्यूला कवटाळावे लागले आहे. दुचाकी वाहनधारकांना गाडी चालविताना पुढच्या वाहनाचा अंदाज घेणे कठीण होत आहे. यापूर्वी गडचांदूर-भोयगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले खरे; परंतु अल्पावधीत रस्त्यावर खड्डे पडले आहे तर भोयगाव फाटा ते भोयगाव पुलापर्यंत १५ वर्षापासून रस्त्याचे काम झालेले नाही. (वार्ताहर)शाळकरी मुलाचाझाला होता मृत्यूयाच मार्गावर वाहनांचा अंदाज घेता न आल्याने राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे शिकणाऱ्या एकोडी येथील शाळकरी मुलाचा ट्रक खाली सापडल्याने एक ते दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. यानंतरही अनेकदा या मार्गावर अपघाती मृत्यू झालेले आहेत.धुळीमुळे शेतपिकेधोक्यातभोयगाव मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील शेतपिके धुळीने खराब होत आहे. कापसासारखे पांढरे शुभ्र पीक काळेकुट्ट पडल्यार्चे चित्र दरवषीच दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.शेतकरी संघटनेचा पुन्हा आंदोलनाचा इशारागेल्या चार महिन्यापूर्वी सदर मार्गासाठी ८५ कोटी मंजूर झाल्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी सांगितले. तशी माहितीही वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही. सदर काम सुरू करण्यात यावे अन्यथा शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करेल.- मदन सातपुते,माजी उपसभापती पं.स. कोरपना