शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

१५ हजार नागरिकांना हवे ‘स्वप्नातील घर’

By admin | Updated: January 18, 2017 00:36 IST

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या १५ हजार नागरिकांनी आॅनलाईन अर्ज सादर करून स्वप्नातील घराची मागणी केली आहे.

पंतप्रधान आवास योजना : फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार चंद्रपूर : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या १५ हजार नागरिकांनी आॅनलाईन अर्ज सादर करून स्वप्नातील घराची मागणी केली आहे. अर्ज स्वीकारणे सुरूच असून फेब्रुवारी महिन्यापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ज्यांनी अर्ज सादर केले, त्या अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूर शहर महानगरपलिका क्षेत्रात येणाऱ्या गरिब व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी शून्य कन्सल्टंट, या अकोलाच्या कंपनीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले. कंपनीने नोव्हेंबर महिन्यात सर्व्हेक्षणाचे व अर्ज स्वीकारणे सुरू केले. आवास योजनेची माहिती मिळताच, लाभार्थ्यांनी मनपा कार्यालयात लांबच लांब रांगा लावून अर्ज सादर केले. ही प्रक्रिया दीड ते दोन महिने चालली. यात १५ हजार नागरिकांनी अर्ज सादर करून घराची मागणी केली आहे. मनपाच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो नागरिकांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहे. आताही अर्ज स्वीकारणे सुरू असून अर्जाची पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्या लाभार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे सुचना दिली जात आहे. जे त्रुटीची पुर्तता करणार नाही, त्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)दिल्लीला पाठविणार अर्ज सर्व्हे करणारी संस्था ‘शून्य कन्सल्टंट’ कंपनीचे चंद्रपूरमध्ये काम पाहणाऱ्या इंगले यांनी सांगितले की, सर्व्हेक्षणाचे काम आताही सुरूच आहे. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी आमच्याकडून सुरू असून अंतिम पडताळणी मनपाचे अधिकारी करणार आहेत. यात पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज म्हाडा कार्यालय, दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.