शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी 15 पालक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 22:48 IST

जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाने ३२५ बालकांनी गमावले आई-वडील

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील ३२५ बालकांनी आई-वडील या दोघांपैकी एक तसेच सात बालकांनी दोन्ही पालकांना गमावले आहे. डोक्यावरील छत्र हरविल्यामुळे या बालकांची वाताहत होऊ नये यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १५ पालक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पालक अधिकारी बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देणार आहे.जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी  बालकांची जबाबदारी घेणार आहे.

जबाबदाऱ्यांची केली विभागणीबालकांना अडचण येऊ नये यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक सदस्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पेन्शन, आधारकार्ड, जन्माचा दाखवा, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांची मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांना कामे करावी लागणार आहे. तर एलआयसीसह इतर पाॅलिसी, बँक खाते, बाल संगोपन आदी कामे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करून द्यावी लागणार आहे.  घरकुलाबाबत गटविकास अधिकारी, कौशल्य विकासासाठी तंत्र शिक्षण अधिकारी, अनाथ बालकांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी शिक्षण    विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू