शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

नऊ महिन्यांतच देशभरात १४६ वाघांचा बळी; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचा अहवाल

By राजेश मडावी | Updated: October 3, 2023 11:28 IST

मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

राजेश मडावी

चंद्रपूर :वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असतानाच मागील नऊ महिन्यांत देशात १४६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या (एनटीसीए) अहवालातून पुढे आली. धक्कादायक म्हणजे, या यादीत मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात विविध कारणांनी ३२ वाघांचा बळी गेला आहे.

भारतात वाघांच्या विविध अवयवांच्या तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत देशात अशा प्रकारची १४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून, गेल्या कित्येक वर्षांतील हा उच्चांक असल्याचे हा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचा अहवाल सांगतो. चालू वर्षात २८ सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक ३४ वाघांचा बळी गेला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या माहितीनुसार, एवढ्या वाघांचा बळी जाण्यासाठी नैसर्गिक व अनैसर्गिक अशी दोन्ही कारणे आहेत. अनेकदा अपघात होऊन वाघांचा बळी जातो, तर काहीवेळा वाघांची आपसात भांडणे होऊन त्यातही वाघ मृत्युमुखी पडतात. वाघांची वाढत चाललेली शिकार हाही आता देशभरात चिंतेचा विषय आहे. वाघांची कातडी आणि नखे दुर्मिळ असल्यामुळे वाघांवर विषप्रयोग केल्याच्या घटनाही घडत आहेत.

असे आहेत वर्षनिहाय वाघांचे बळी

२०१२ मध्ये देशात ८८ वाघांचा बळी गेला होता. २०१३ मध्ये ६८, २०१४ मध्ये ७८, २०१५ मध्ये ८२, २०१६ मध्ये १२१, २०१७ मध्ये ११७, २०१८ मध्ये १०१, २०१९ मध्ये ९६, २०२० मध्ये १०६, २०२१ मध्ये १२७ तर २०२२ मध्ये १२१ वाघांचा मृत्यू झाला. मागील नऊ महिन्यांत उत्तराखंड राज्यात १७, आसाम ११, कर्नाटक ९ व राजस्थानमध्ये ५ वाघांचा बळी गेला. सर्व बळींमध्ये २४ बछडे होते. यातील ७० वाघ देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये राहात होते.

व्याघ्र प्राधिकरणाची सहा मुद्द्यांवर चिंता

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणने वाघांच्या मृत्यूसंदर्भात खालील सहा मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केली. यामध्ये वाघांचे धोकादायक संचार मार्ग, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजनांतील उणिवा, व्याघ्र अवयवांची तस्करी, शिकाऱ्यांवर अंकुश मिळविणे, वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखड्यातील त्रुटी व व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण करण्याबाबतच्या अडचणी आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर