शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांतच देशभरात १४६ वाघांचा बळी; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचा अहवाल

By राजेश मडावी | Updated: October 3, 2023 11:28 IST

मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

राजेश मडावी

चंद्रपूर :वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असतानाच मागील नऊ महिन्यांत देशात १४६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या (एनटीसीए) अहवालातून पुढे आली. धक्कादायक म्हणजे, या यादीत मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षात २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात विविध कारणांनी ३२ वाघांचा बळी गेला आहे.

भारतात वाघांच्या विविध अवयवांच्या तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत देशात अशा प्रकारची १४ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून, गेल्या कित्येक वर्षांतील हा उच्चांक असल्याचे हा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचा अहवाल सांगतो. चालू वर्षात २८ सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक ३४ वाघांचा बळी गेला आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या माहितीनुसार, एवढ्या वाघांचा बळी जाण्यासाठी नैसर्गिक व अनैसर्गिक अशी दोन्ही कारणे आहेत. अनेकदा अपघात होऊन वाघांचा बळी जातो, तर काहीवेळा वाघांची आपसात भांडणे होऊन त्यातही वाघ मृत्युमुखी पडतात. वाघांची वाढत चाललेली शिकार हाही आता देशभरात चिंतेचा विषय आहे. वाघांची कातडी आणि नखे दुर्मिळ असल्यामुळे वाघांवर विषप्रयोग केल्याच्या घटनाही घडत आहेत.

असे आहेत वर्षनिहाय वाघांचे बळी

२०१२ मध्ये देशात ८८ वाघांचा बळी गेला होता. २०१३ मध्ये ६८, २०१४ मध्ये ७८, २०१५ मध्ये ८२, २०१६ मध्ये १२१, २०१७ मध्ये ११७, २०१८ मध्ये १०१, २०१९ मध्ये ९६, २०२० मध्ये १०६, २०२१ मध्ये १२७ तर २०२२ मध्ये १२१ वाघांचा मृत्यू झाला. मागील नऊ महिन्यांत उत्तराखंड राज्यात १७, आसाम ११, कर्नाटक ९ व राजस्थानमध्ये ५ वाघांचा बळी गेला. सर्व बळींमध्ये २४ बछडे होते. यातील ७० वाघ देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये राहात होते.

व्याघ्र प्राधिकरणाची सहा मुद्द्यांवर चिंता

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणने वाघांच्या मृत्यूसंदर्भात खालील सहा मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केली. यामध्ये वाघांचे धोकादायक संचार मार्ग, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजनांतील उणिवा, व्याघ्र अवयवांची तस्करी, शिकाऱ्यांवर अंकुश मिळविणे, वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखड्यातील त्रुटी व व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण करण्याबाबतच्या अडचणी आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर