शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१,४४५ शाळा सुरू, मात्र महाविद्यालये अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी २८ जानेवारीपासून शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांचे समुपदेशन केले. परिणामी, विद्यार्थ्यांचा आता उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यात १३३ महाविद्यालये येतात. या महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महाविद्यालये सुरू झाली. प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य केले. काही महाविद्यालयांमध्ये अध्यापनही सुरू झाले आहेत; मात्र बहुतांश महाविद्यालयात विद्यार्थीच उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

१६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनीही हाच मार्ग स्वीकारला. कोरोनाचा संसर्ग कमी झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी झाली. त्यामुळे पालक हमीपत्र भरून देत आहेत; परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांच्या पालकांकडून हमीपत्र कसे भरून घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

कोरोनामुळे कुटुंबीयांनी महाविद्यालयात जाण्यासाठी सहमती दिली नाही. त्यामुळे मी घरीच राहून अभ्यास करतो. माझे बरेच वर्गमित्र याच पद्धतीने अभ्यास करीत आहेत. वर्गात येण्याबाबत कॉलेजकडूनही तगादा नाही. केवळ दिवस पुढे जात आहेत.

- श्रीकांत माहुरे, चंद्रपूर.

कोट

कॉलेजात येणारे विद्यार्थी कमी आहेत. तासिका होतात; पण म्हणावा तसा आनंद नाही. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मी कॉलेजात येत आहे. कोरोनामुळे बरेच जण पार्टटाइम रोजगाराकडे वळले. कुटुंबाची गरज म्हणून हे पाऊल उचलावे लागते.

कोट

मास्क लावून तासिका घेता येऊ शकतात. कॉलेजचे मुले-मुली सुजाण असतात. त्यांना चांगले व वाईट कळते. कॉलेज व विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पर्याय शोधला पाहिजे.

- यमक गोपुरे, विद्यार्थी हितकारिणी संघटना, चंद्रपूर.

कोट

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कॉलेज व विद्यापीठाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मुले कॉलेजात येत नसतील त्यांच्या प्रोत्साहनासाठी पालकांची मदत घेतली पाहिजे; परंतु हातात हात ठेवून बसणे चुकीचे आहे.

-आकाश कांबळे, युवा प्रबोधिनी, बाबूपेठ, चंद्रपूर.