शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार ७११ कृषिपंपधारक शेतकरी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:51 IST

चंद्रपूर : राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या अंतर्गत धोरणाचे फायदे जास्तीत जास्त ...

चंद्रपूर : राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या अंतर्गत धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ माार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत जनजागृती अभियान राबविणे सुरू आहे. कृषी ऊर्जापर्व अंतर्गत चंद्रपूर परिमंडळातील तब्बल १४ हजार ७११ कृषीपंपधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरून थकबाकीमुक्त झाले असून आतापर्यंत ९ कोटी ४९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. कोरोनाकाळ तसेच वीज बिल भरण्यात अस्थिरता असतानाही महावितरण चंद्रपूर परिमंडळाने वसुलीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ३०८ महिला कृषीपंपधारक आहे.

राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. १० मार्च२०२१ पर्यंत एकूण १४ हजार ७११ कृषी पंपधारकांनी ९ कोटी ४९ लाखांचा भरणा केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार ५२७ कृषी ग्राहकांनी ६ कोटी ९६ लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार १८४ कृषी ग्राहकांनी २ कोटी ५३ लाखांचा भरणा केला आहे. थकबाकीमुक्त झालेल्या कृषी पंपधारकांपैकी एकंदरीत ३ हजार ५६१ कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्त झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात ३०८ महिलांचा समावेश आहे. महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकीमुक्त झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कोट

ग्रामसभा, मेळावे तसेच कृषी धोरणांविषयी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक आता वीज भरून थकबाकीमुक्त होत आहेत. अधिकाधिक वीजग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

-सुनील देशपांडे

मुख्य अभियंता, महावितरण

बाॅक्स

कृषी ऊर्जा पर्वाअंतर्गत ४६१ ग्रामसभा घेण्यात आल्या. ४११ कृषी मेळावे, १४ सायकल रॅली, २३२ बांधांवर ‘महावितरण’चे अधिकाऱ्यांनी जावून-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृषी पंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृषीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीज सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे.