शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

१४ हजार ७११ कृषिपंपधारक शेतकरी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:51 IST

चंद्रपूर : राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या अंतर्गत धोरणाचे फायदे जास्तीत जास्त ...

चंद्रपूर : राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या अंतर्गत धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ माार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत जनजागृती अभियान राबविणे सुरू आहे. कृषी ऊर्जापर्व अंतर्गत चंद्रपूर परिमंडळातील तब्बल १४ हजार ७११ कृषीपंपधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरून थकबाकीमुक्त झाले असून आतापर्यंत ९ कोटी ४९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. कोरोनाकाळ तसेच वीज बिल भरण्यात अस्थिरता असतानाही महावितरण चंद्रपूर परिमंडळाने वसुलीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ३०८ महिला कृषीपंपधारक आहे.

राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. १० मार्च२०२१ पर्यंत एकूण १४ हजार ७११ कृषी पंपधारकांनी ९ कोटी ४९ लाखांचा भरणा केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार ५२७ कृषी ग्राहकांनी ६ कोटी ९६ लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार १८४ कृषी ग्राहकांनी २ कोटी ५३ लाखांचा भरणा केला आहे. थकबाकीमुक्त झालेल्या कृषी पंपधारकांपैकी एकंदरीत ३ हजार ५६१ कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्त झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात ३०८ महिलांचा समावेश आहे. महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकीमुक्त झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कोट

ग्रामसभा, मेळावे तसेच कृषी धोरणांविषयी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक आता वीज भरून थकबाकीमुक्त होत आहेत. अधिकाधिक वीजग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

-सुनील देशपांडे

मुख्य अभियंता, महावितरण

बाॅक्स

कृषी ऊर्जा पर्वाअंतर्गत ४६१ ग्रामसभा घेण्यात आल्या. ४११ कृषी मेळावे, १४ सायकल रॅली, २३२ बांधांवर ‘महावितरण’चे अधिकाऱ्यांनी जावून-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृषी पंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृषीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीज सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे.