शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

133 नवीन तलाठी साझ्यांवर अखेर अंतिम शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:48 IST

 १३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील महसुली गावांची संख्या वाढून तलाठी साझे कमी असल्याने प्रशासनावर मोठा ताण आला होता. राज्य शासनाने अखेर नवीन १३३ नवीन तलाठी साझे निर्माण करण्यास अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नवीन तलाठ्यांची नियुक्ती झाल्यानंतर महसुली प्रशासनावरील ताण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यात एकूण गावे १ हजार ८३६ गावे, ५० मंडळ आणि २९९ तलाठी साझे आहेत. वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामांची व्याप्ती लक्षात घेऊन २०१७ मध्ये नव्याने साझे निर्माण करण्याचा प्रस्ताव  तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कार्यकाळात राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.  राज्य शासनाने तो प्रस्ताव मान्य केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नवीन १३३ साझ्यांच्या पूनरर्चनेला मान्यता प्रदान केली.   २०१७ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रकाशित झाली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी गुरुवारी केली. आता जिल्ह्यात ४३२ तलाठी साझे निर्माण झाले आहेत. विदर्भ पटवारी संघटनेनेही यासाठी शासनाकडे पाठपूरावा केला होता. 

पदनिर्मिती होईपर्यंत नजीकच्या तलाठ्याकडे कारभार १३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केली आहे.

 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारी