शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

१३ गावातील जनतेचा धारिवाल कंपनीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:31 IST

एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.

ठळक मुद्दे१५ दिवसात बैठक घेऊन समस्यांवर चर्चा करण्याची कंपनी व्यवस्थापनाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.ताडाळी येथे असलेल्या धारिवाल कंपनीने स्थानिक नागरिकांनाच नोकरी द्यावी. सीएसआर निधीचा वापर युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी करावा. कंपनीतून अवैधरित्या होणारी जडवाहतुक बंद करण्यात यावी. प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात. प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील जैन भवन परिसरातून ताडाळी टी पार्इंटपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर आठ-दहा बैलबंडीच्या माध्यमातून मोर्चा धारिवाल कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहचला. मोर्चाचे स्वरूप पाहुन मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविण्यात आला. शिष्टमंडळाने आत जावून कंपनी व्यवस्थापनाला निवेदन द्यावे असा प्रस्ताव किशोर जोरगेवार यांनी फेटाळून लावत व्यवस्थापनाने मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्वीकारावे व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर कंपनी व्यवस्थापनासह तहसीलदार भास्करवार हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी किशोर जोरगेवार व मोर्चकऱ्यांसोबत वाटाघाटी केल्या. यामध्ये येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने दिली. ज्या समस्या तात्काळ सोडविता येईल. त्या लगेच सोडविल्या जाईल. व काही समस्या सोडविण्यासाठी कालावधीत निर्धारीत केला जाईल, हे ठरले. या बैठकीची जबाबदारी तहसीलदार भास्करवार व पडोलीच्या ठाणेदार ढाले यांनी घेतल्याने मोर्चेकरी शांत झाले. या मोर्चात परिसरातील १३ गावातील नागरिकांसह बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा कंपनी गेटवर आला. त्यांचे निवेदन स्वीकारून मोर्चेकरांशी चर्चा केली. येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मोर्चकरांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल.- संदीप मुखर्जी, व्यवस्थापक प्रमुख, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. ताडाळी.