शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१३ गावातील जनतेचा धारिवाल कंपनीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:31 IST

एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.

ठळक मुद्दे१५ दिवसात बैठक घेऊन समस्यांवर चर्चा करण्याची कंपनी व्यवस्थापनाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.ताडाळी येथे असलेल्या धारिवाल कंपनीने स्थानिक नागरिकांनाच नोकरी द्यावी. सीएसआर निधीचा वापर युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी करावा. कंपनीतून अवैधरित्या होणारी जडवाहतुक बंद करण्यात यावी. प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात. प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील जैन भवन परिसरातून ताडाळी टी पार्इंटपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर आठ-दहा बैलबंडीच्या माध्यमातून मोर्चा धारिवाल कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहचला. मोर्चाचे स्वरूप पाहुन मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविण्यात आला. शिष्टमंडळाने आत जावून कंपनी व्यवस्थापनाला निवेदन द्यावे असा प्रस्ताव किशोर जोरगेवार यांनी फेटाळून लावत व्यवस्थापनाने मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्वीकारावे व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर कंपनी व्यवस्थापनासह तहसीलदार भास्करवार हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी किशोर जोरगेवार व मोर्चकऱ्यांसोबत वाटाघाटी केल्या. यामध्ये येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने दिली. ज्या समस्या तात्काळ सोडविता येईल. त्या लगेच सोडविल्या जाईल. व काही समस्या सोडविण्यासाठी कालावधीत निर्धारीत केला जाईल, हे ठरले. या बैठकीची जबाबदारी तहसीलदार भास्करवार व पडोलीच्या ठाणेदार ढाले यांनी घेतल्याने मोर्चेकरी शांत झाले. या मोर्चात परिसरातील १३ गावातील नागरिकांसह बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा कंपनी गेटवर आला. त्यांचे निवेदन स्वीकारून मोर्चेकरांशी चर्चा केली. येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मोर्चकरांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल.- संदीप मुखर्जी, व्यवस्थापक प्रमुख, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. ताडाळी.