शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

१३ गावातील जनतेचा धारिवाल कंपनीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:31 IST

एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.

ठळक मुद्दे१५ दिवसात बैठक घेऊन समस्यांवर चर्चा करण्याची कंपनी व्यवस्थापनाची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.ताडाळी येथे असलेल्या धारिवाल कंपनीने स्थानिक नागरिकांनाच नोकरी द्यावी. सीएसआर निधीचा वापर युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी करावा. कंपनीतून अवैधरित्या होणारी जडवाहतुक बंद करण्यात यावी. प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात. प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील जैन भवन परिसरातून ताडाळी टी पार्इंटपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर आठ-दहा बैलबंडीच्या माध्यमातून मोर्चा धारिवाल कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहचला. मोर्चाचे स्वरूप पाहुन मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविण्यात आला. शिष्टमंडळाने आत जावून कंपनी व्यवस्थापनाला निवेदन द्यावे असा प्रस्ताव किशोर जोरगेवार यांनी फेटाळून लावत व्यवस्थापनाने मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्वीकारावे व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर कंपनी व्यवस्थापनासह तहसीलदार भास्करवार हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी किशोर जोरगेवार व मोर्चकऱ्यांसोबत वाटाघाटी केल्या. यामध्ये येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने दिली. ज्या समस्या तात्काळ सोडविता येईल. त्या लगेच सोडविल्या जाईल. व काही समस्या सोडविण्यासाठी कालावधीत निर्धारीत केला जाईल, हे ठरले. या बैठकीची जबाबदारी तहसीलदार भास्करवार व पडोलीच्या ठाणेदार ढाले यांनी घेतल्याने मोर्चेकरी शांत झाले. या मोर्चात परिसरातील १३ गावातील नागरिकांसह बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा कंपनी गेटवर आला. त्यांचे निवेदन स्वीकारून मोर्चेकरांशी चर्चा केली. येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मोर्चकरांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल.- संदीप मुखर्जी, व्यवस्थापक प्रमुख, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. ताडाळी.