शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नऊ कंत्राटदारांवर १२ कोटींचे वसुली दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडे काम करणाºया ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कामगारांना किमान वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत ....

ठळक मुद्देकामगार आयुक्तांचे आदेश : किमान वेतन प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडे काम करणाºया ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कामगारांना किमान वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत किमान वेतन अधिनियमनुसार वसूली दावे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ९ कंत्राटदारांवर १२ कोटी २३ लाख २१ हजार ३४ रुपयांचे वसूली दावे कामगार आयुक्त कार्यालयाने दाखल केले आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.जिल्हा परिषदेद्वारे जिल्ह्यातील विविध कंत्राटदारांना पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराने या कामासाठी शेकडो कामगारांची नियुक्ती केली होती. मात्र त्या सर्व कामगारांना तुटपुजे मानधन देण्यात येत होते. त्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष हर्षल चिपळूणकर यांनी कामगारांना किमान वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र कोणत्याही कंत्राटदाराने कामगारांना किमान वेतन दिले नाही. त्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेने २८ आॅगस्टला वसूली दावा दाखल केला होता. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्ताने जिल्हा परिषदेच्या ९ कंत्राटदारावर १२ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वसूली दावे दाखल केले आहे. त्यामध्ये ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग बोथलीचे (राजोली) अनिल गोरे, सुभाष घडसे, सोनापूर विभागातर्फे चंद्रकांत भोयर, व्याहाड खुर्द विभागातर्फे राजेंद्र कन्नमवार, व्याहाड बुजतर्फे प्रदीप पोटदुखे, मेंडकी विभागतर्फे अतुल गोरे, बोरचांदली विभागातर्फे शुभम इंजी.वर्क मूल, टेकाडी विभागातर्फे प्रियंका वैरागडे या कंत्राटदारांवर १२ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वसूली दावे दाखल केले आहे. या प्रकरणाचा निकाल कामगारांच्या बाजूने लागल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व नवही कंत्राटदारांना किमान वेतन देणे आवश्यक राहणार असून अन्यथा दंड भरावे लागणार आहे.कामगारांना न काढण्याचे आदेशकामगारांना योग्य वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत किमान वेतन अधिनियमनुसार वसूली दावे दाखल करण्यात आले. यावेळी कंत्राटदारांकडून कामगारांना दमदाटी करून बेकायदेशीर काढून टाकण्यात येत होते. त्यामुळे सदर प्रकरणाची सुनावणी सुरु असताना कोणत्याही कामगारांना कामावरुन काढू नये, असे आदेश सहाय्य कामगार आयुक्तांनी दिले आहे.