शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नऊ कंत्राटदारांवर १२ कोटींचे वसुली दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडे काम करणाºया ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कामगारांना किमान वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत ....

ठळक मुद्देकामगार आयुक्तांचे आदेश : किमान वेतन प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांकडे काम करणाºया ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कामगारांना किमान वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत किमान वेतन अधिनियमनुसार वसूली दावे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ९ कंत्राटदारांवर १२ कोटी २३ लाख २१ हजार ३४ रुपयांचे वसूली दावे कामगार आयुक्त कार्यालयाने दाखल केले आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.जिल्हा परिषदेद्वारे जिल्ह्यातील विविध कंत्राटदारांना पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराने या कामासाठी शेकडो कामगारांची नियुक्ती केली होती. मात्र त्या सर्व कामगारांना तुटपुजे मानधन देण्यात येत होते. त्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष हर्षल चिपळूणकर यांनी कामगारांना किमान वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र कोणत्याही कंत्राटदाराने कामगारांना किमान वेतन दिले नाही. त्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेने २८ आॅगस्टला वसूली दावा दाखल केला होता. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्ताने जिल्हा परिषदेच्या ९ कंत्राटदारावर १२ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वसूली दावे दाखल केले आहे. त्यामध्ये ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग बोथलीचे (राजोली) अनिल गोरे, सुभाष घडसे, सोनापूर विभागातर्फे चंद्रकांत भोयर, व्याहाड खुर्द विभागातर्फे राजेंद्र कन्नमवार, व्याहाड बुजतर्फे प्रदीप पोटदुखे, मेंडकी विभागतर्फे अतुल गोरे, बोरचांदली विभागातर्फे शुभम इंजी.वर्क मूल, टेकाडी विभागातर्फे प्रियंका वैरागडे या कंत्राटदारांवर १२ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वसूली दावे दाखल केले आहे. या प्रकरणाचा निकाल कामगारांच्या बाजूने लागल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व नवही कंत्राटदारांना किमान वेतन देणे आवश्यक राहणार असून अन्यथा दंड भरावे लागणार आहे.कामगारांना न काढण्याचे आदेशकामगारांना योग्य वेतन न दिल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेमार्फत किमान वेतन अधिनियमनुसार वसूली दावे दाखल करण्यात आले. यावेळी कंत्राटदारांकडून कामगारांना दमदाटी करून बेकायदेशीर काढून टाकण्यात येत होते. त्यामुळे सदर प्रकरणाची सुनावणी सुरु असताना कोणत्याही कामगारांना कामावरुन काढू नये, असे आदेश सहाय्य कामगार आयुक्तांनी दिले आहे.