शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

भद्रावती, वरोरा तालुक्यात होणार ११,७६० क्विंटल मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा ...

भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा स्थितीत त्यांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा योजनेची लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

भद्रावती तालुक्यात गव्हाचे २,९४० क्विंटल तर तांदूळ १,४७० क्विंटल, वरोरा तालुक्यात गहू ४,२०१ क्विंटल तर तांदळाचे ३,१५० क्विंटल मोफत वाटप होणार आहे. याशिवाय भद्रावती येथ १५० थाळी तर वरोरा येथे ३०० थाळींचे मोफत वितरण होणार असून नागरिकांना कोरोना काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना तांदूळ, गव्हाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यात अंतोदय रेशनकार्ड धारकास प्रति कार्ड १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, असे ३५ किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. तर प्राधान्य गट योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य यात तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यात एकूण ११ हजार ७६० क्विंटल धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी केले आहे.