शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

भद्रावती, वरोरा तालुक्यात होणार ११,७६० क्विंटल मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा ...

भद्रावती : कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प पडून त्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा स्थितीत त्यांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा योजनेची लक्ष्य निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

भद्रावती तालुक्यात गव्हाचे २,९४० क्विंटल तर तांदूळ १,४७० क्विंटल, वरोरा तालुक्यात गहू ४,२०१ क्विंटल तर तांदळाचे ३,१५० क्विंटल मोफत वाटप होणार आहे. याशिवाय भद्रावती येथ १५० थाळी तर वरोरा येथे ३०० थाळींचे मोफत वितरण होणार असून नागरिकांना कोरोना काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना तांदूळ, गव्हाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यात अंतोदय रेशनकार्ड धारकास प्रति कार्ड १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, असे ३५ किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. तर प्राधान्य गट योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य यात तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यात एकूण ११ हजार ७६० क्विंटल धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी केले आहे.