शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

११५ शेतकरी सावकारी कर्जमुक्त

By admin | Updated: September 7, 2016 00:47 IST

विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत...

कर्जाची रक्कम सावकारांना अदा : आणखी प्रकरणे कर्ज मुक्तीसाठी सादरचंद्रपूर : विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत सावकारही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादरात कर्ज वसुल करतात. शेतकऱ्यांच्या या जाचातून सुटका करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११५ शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त झाले आहेत.गावगाड्यात अजूनही सावकारांकडून पीक कर्जासाठी पैसे घेतले जातात. यातील बरेच सावकार नोंदणीकृत असतात तर काही जण अनधिकृतपणे सावकारीचा व्यवसाय करीत असतात. या सावकारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. जास्त दरात कर्ज वसुल करण्यासोबतच गहाण वस्तुही सावकारांकडून हडपल्या जातात. सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने सुरु केली होती.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन सदर कर्ज शासनाच्या वतीने सावकारांना अदा केल्या जाणार होते. त्या अंतर्गत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम तालुका व जिल्हा समितीने प्रारंभ केले होते. जिल्ह्यात २४२ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांना आपल्याकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे सादर करावयाची होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६०८ कर्जमुक्तीची प्रकरणे सादर झाली होती. सदर प्रकरणे सादर झाल्यानंतर तालुका समितीने बैठक घेवून पात्र प्रकरणे जिल्हा समितीसमोर सादर करावयाचे होते. त्यानुसार प्रस्तावाच्या छाननी अंती १५२ प्रकरणे जिल्हास्तरीय समिती समोर कर्ज माफीसाठी ठेवण्यात आली. यातील ११५ प्रकरणे जिल्हा समितीने मंजूर केली आहे. मंजूर प्रकरणातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले ११ लाख ४१ हजार कर्जाची मुद्दल तसेच १ लाख ९२ हजार रूपयाचे व्याज असे एकूण १३ लाख ३३ हजार रुपये शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे सावकारांना अदा केले आहे. त्यामुळे सदर ११५ शेतकरी पूर्णपणे सावकार कर्जमुक्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गहाण वस्तूही परत केलेकर्ज घेताना सावकाराने गहाण म्हणून काही वस्तू ठेवून घेतलेल्या असल्यास त्याही परत करण्याची तरतूद असल्याने अशा वस्तू परत करण्यात आल्या आहेत. आणखी काही प्रकरणे कर्जमाफीसाठी जिल्हा समिती समोर आले असून समितीच्या बैठकीनंतर आणखी काही शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त होणार आहेत.खरीप कर्जमाफी करण्याची मागणीशासनाने शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त केले असले तरी खरिप पीक लागवडीसाठी विविध बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांचे थकीत आहे. सावकारी कर्जापेक्षा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून शासनाने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.