शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

११५ शेतकरी सावकारी कर्जमुक्त

By admin | Updated: September 7, 2016 00:47 IST

विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत...

कर्जाची रक्कम सावकारांना अदा : आणखी प्रकरणे कर्ज मुक्तीसाठी सादरचंद्रपूर : विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत सावकारही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वादरात कर्ज वसुल करतात. शेतकऱ्यांच्या या जाचातून सुटका करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११५ शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त झाले आहेत.गावगाड्यात अजूनही सावकारांकडून पीक कर्जासाठी पैसे घेतले जातात. यातील बरेच सावकार नोंदणीकृत असतात तर काही जण अनधिकृतपणे सावकारीचा व्यवसाय करीत असतात. या सावकारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. जास्त दरात कर्ज वसुल करण्यासोबतच गहाण वस्तुही सावकारांकडून हडपल्या जातात. सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गेल्या वर्षी सावकारी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने सुरु केली होती.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन सदर कर्ज शासनाच्या वतीने सावकारांना अदा केल्या जाणार होते. त्या अंतर्गत सावकारांकडून कर्ज घेतलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्याचे काम तालुका व जिल्हा समितीने प्रारंभ केले होते. जिल्ह्यात २४२ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांना आपल्याकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे सादर करावयाची होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६०८ कर्जमुक्तीची प्रकरणे सादर झाली होती. सदर प्रकरणे सादर झाल्यानंतर तालुका समितीने बैठक घेवून पात्र प्रकरणे जिल्हा समितीसमोर सादर करावयाचे होते. त्यानुसार प्रस्तावाच्या छाननी अंती १५२ प्रकरणे जिल्हास्तरीय समिती समोर कर्ज माफीसाठी ठेवण्यात आली. यातील ११५ प्रकरणे जिल्हा समितीने मंजूर केली आहे. मंजूर प्रकरणातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले ११ लाख ४१ हजार कर्जाची मुद्दल तसेच १ लाख ९२ हजार रूपयाचे व्याज असे एकूण १३ लाख ३३ हजार रुपये शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे सावकारांना अदा केले आहे. त्यामुळे सदर ११५ शेतकरी पूर्णपणे सावकार कर्जमुक्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गहाण वस्तूही परत केलेकर्ज घेताना सावकाराने गहाण म्हणून काही वस्तू ठेवून घेतलेल्या असल्यास त्याही परत करण्याची तरतूद असल्याने अशा वस्तू परत करण्यात आल्या आहेत. आणखी काही प्रकरणे कर्जमाफीसाठी जिल्हा समिती समोर आले असून समितीच्या बैठकीनंतर आणखी काही शेतकरी सावकारी कजार्तून मुक्त होणार आहेत.खरीप कर्जमाफी करण्याची मागणीशासनाने शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त केले असले तरी खरिप पीक लागवडीसाठी विविध बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांचे थकीत आहे. सावकारी कर्जापेक्षा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून शासनाने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.