शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

१११ निमशिक्षकांना आले ‘अच्छे दिन’

By admin | Updated: June 25, 2014 00:21 IST

ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील वस्ती, पाडे, तांड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने १३ वर्षापूर्वी निमशिक्षकांची नेमणूक करून येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यास

जिवती तालुक्यात सर्वाधिक : १३ वर्षांपासून होते शिक्षक कार्यरतचंद्र्रपूर : ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील वस्ती, पाडे, तांड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने १३ वर्षापूर्वी निमशिक्षकांची नेमणूक करून येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक घडवित आहे. त्या शिक्षकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत होते. त्यामुळे निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा द्यावा, अशी मागणी या शिक्षकांची होती. या शिक्षकांची मागणी शासनाने मान्य केली असून जिल्ह्यातील तब्बल १११ निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे निमशिक्षकांमध्ये आंनदाचे वातावरण असून यापुढेही आपली सेवा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देणार असल्याचे शिक्षकांनी मत व्यक्त केले आहे.सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यानुसार ग्रामीण भागात तसेच तांडे, वस्ती, पाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निमशीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक वस्ती, तांड्यामध्ये पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शासनाला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे शासनाने मानधन देवून निमशिक्षकांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरु केले. मात्र या शिक्षकांना केवळ ३ ते ४ हजार रुपये मानधनावर काम करावे लागत होते. त्यामुळे त्यांना आपले कुटुंब चालविणे कठिण झाले. शासकीय नियमानुसार या शिक्षकांना वेतन तथा भत्ते देण्यात येत नव्हेत. हलाखिच्या परिस्थितीत सदर शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहे. त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्याची मागणी या शिक्षकांनी शासनाकडे रेटून धरली. शासनाने त्यांची मागणी आता मान्य केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १११ निमशिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहे. (नगर प्रतिनिधी)