शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

११ गटविकास अधिकारी रडारवर

By admin | Updated: August 19, 2016 01:49 IST

जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

कारणे दाखवा : स्वच्छ भारत मिशनचे काम रेंगाळले चंद्रपूर : जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु तीन पंचायत समित्या वगळता इतर पंचायत समित्यांनी दिलेले उद्दिष्ट गाठले नाही. स्वच्छ भारत मिशनच्या कामात हयगय करणाऱ्या गडविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसचे उत्तर तीन दिवसांमध्ये सादर करायचे आहे. तसेच पुढील काळात उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी देण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. या मिशनच्या प्रचारासाठी सेलिब्रटी व्यक्तींची मदत घेतली जात आहे. संपूर्ण देशभरात राबविण्यात येणारे स्वच्छता मिशन चंद्रपूर जिल्हा परिषदेतही राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक पंचायत समितीला स्वच्छ भारत मिशनकरिता ग्रामपंचायती दत्तक देण्यात आल्या आहेत. त्या पंचायत समित्यांना १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी दिले आहे. मुख्य कार्यकरी अधिकारी सिंह यांनी १५ आॅगस्टची मुदत दिल्यानंतरही काही गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशनला प्राधान्य दिले नाही. ही बाब सिंह यांनी मनावर घेतली असून संबंधीत बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामपंचायती दत्तक घेऊनही काही गटविकास अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतच्या हागणदारीमुक्तीकडे लक्ष दिले नाही. त्याकडे दुर्लक्ष करणे आता त्यांना भोवले आहे. (प्रतिनिधी) ७७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना १५ आॅगस्टपर्यंत १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी केवळ ७७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या आहेत. काही गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी रडारवर घेतले आहे. तीन बीडीओंचा गौरव १५ आॅगस्टपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात तीन गटविकास अधिकारी यशस्वी ठरले आहेत. त्यापैकी दोन गटविकास अधिकारी सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामध्ये ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम बोकडे आणि भद्रावती पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांचे सीईओ सिंह यांनी अभिनंदन केले आहे. पंधरवाड्याचे नियोजन जानेवारी २०१८पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमक्त करण्याचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी पंधरवाड्याचे नियोजन करण्यात आले होते. हे पंधरवाड्याचे नियोजन काही गटविकास अधिकाऱ्यांनी सीईओंकडे पाठविले नाही. त्यानुसार, हागणदारीमुक्तीसाठी नियोजन केले नाही. त्यामुळे त्यांना उद्दिष्ट गाठता आले नाही. पंतप्रधानांनी प्राधान्यक्रमाने स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम राबविला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी कामात हयगय केलेली चालणार नाही. त्यांनी वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. - एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.