शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मंगीतील ११ कुटुंब जगताहेत बहिष्कृत जीणे !

By admin | Updated: August 11, 2014 23:50 IST

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष लोटले. मात्र मात्र पारतंत्र्यांची बेडी अद्याप अनेकांच्या हातात कायम असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी या छोट्याशा गावामध्ये ९० आदिवासी

राजुरा : देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष लोटले. मात्र मात्र पारतंत्र्यांची बेडी अद्याप अनेकांच्या हातात कायम असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी या छोट्याशा गावामध्ये ९० आदिवासी कुटुंबापैकी अकरा आदिवासी कुटुंबावर त्याच गावातील गावपाटलांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे मागील अनेक वर्षांपासून मंगीतील अकरा आदिवासी कुटुंब बहिष्कृत जिणे जगत आहेत.गावातून बहिष्कृत असलेल्या या ११ कुटुंबातील सर्व व्यक्तींना कोणत्याही सामाजिक व धार्मीक उत्सवात सहभागी होता येत नाही. त्यांना या गावामध्ये इतर कोणत्याही कार्यक्रमात तर सहभागी होताच येत नाही, सोबतच त्यांना कोणत्याही समाजातील व्यक्तीसोबत व्यवहार करण्यास बंदी टाकली आहे. या गावातील गावपंचायतीचा प्रभाव आजही या ठिकाणी दिसत असून क्षुल्लक कारणावरून या गावातील कारभाऱ्यानी या अकरा कुटुंबाचे जीवन उद्धवस्त करणाऱ्याचा निर्णय घेतला आहे. यावरील बंदी उठवण्याचा योग्य प्रयत्न एकाही अधिकारी व राजकीय नेत्यानी चालविला नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून येथील अकरा कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. या मंगी गावातील मुलगी लिला हिने बंडू सिडाम या युवकासोबत प्रेमविवाह केला. हाच मुद्दा पुढे करून या मुलीच्या भावावर गावपाटलांनी सामाजिक बहिष्कार टाकला.आदिवासी समाज सन्मानाने गापाटलाची नियुक्ती करतो. त्याच्या जोडीला चार कारभारी दिले जातात. बहिष्कृत करणाऱ्या या क्रूर प्रथेला काही जणांनी विरोध दर्शविला. मात्र गावपाटील व त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांनाही बहिष्कृत केले आहे. राजुरा तालुक्यातील मंगी या गावातील हे बहिष्कृत ११ कुटुंब एकविसाव्या शतकातही अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असून शासन कितीही योजना आदिवासीसाठी कार्यान्वित केल्या तरी एका दशकापासून त्यांना याचा लाभ मिळत नाही आहे, ही दुर्देवाची बाब आहे.शासनाने आतातरी या गावामध्ये जाऊन योग्य समन्वय घडवून आणावा, असा मानस व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)