शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार, पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्ये यावरून चर्चांना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा ...

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्ये यावरून चर्चांना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात दहावीची १८ हजार ६९० मुले तर १६ हजार ३९१ मुली असे एकूण ३५ हजार ८१ विद्यार्थी तर बारावीमध्ये १४ हजार ५४७ मुले आणि १४ हजार २४२ मुली अशी २८,७८९ विद्यार्थी संख्या आहे. ऑफलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनच परीक्षा द्यावी लागणार आहे. शहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातीलच केंद्रावर तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी पालक आपले मत व्यक्त करीत आहेत. काही पालकांना परीक्षा ऑफलाइन तर काहींना ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे वाटत आहे. मात्र काही पालक संकटावर मात करून मंडळाने ऑफलाइनच परीक्षा घ्यावी, यावर ठाम आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे

विद्यार्थी संख्या

दहावी - ३५,०८१

बारावी - २८,७८९

प्रतिक्रिया

कोट

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. मात्र कोरोना संकटामुळे पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचे नियम काटेकोर पाळून ऑफलाइन परीक्षा घेण्यात काहीही हरकत नाही.

- नारायण सावे, चंद्रपूर

--

दरवर्षी विद्यार्थी शाळेत जाऊन अभ्यास करायचे, या वर्षी अजूनही पूर्णपणे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा सराव झाला नाही. तरीही विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांनी अधिकाधिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष देऊन ऑफलाइन परीक्षा घ्यावी.

- नामदेव लचके

चंद्रपूर

-

विद्यार्थ्यांच्या भविष्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संकटावर मात करून कोरोनाचे नियम पाळून परीक्षा घ्यावी. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल.

- मीरा ससनकर, चंद्रपूर

--

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

प्रत्येक वर्षी परीक्षा काळात काही ना काही संकट येतेच. त्यामुळे न घाबरता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. बारावीचे विद्यार्थी मोठे असतात. त्यांना आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.

- अरुण नहाले

-

आरोग्यासंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. कोरोना संकट काळात परीक्षा असली तरी विद्यार्थी न डगमगता परीक्षा देणार आहेत. यामध्ये पालकांना चिंता वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र मंडळाने जाहीर केलेला निर्णय योग्यच आहे.

- मीना आत्राम

चंद्रपूर

--

मागील काही दिवसांत कोरोना संकटाने डोके वर काढले आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर तसे प्रयत्न केले जात आहेत. असे असताना ऑफलाइन परीक्षा घेऊन शाळांमध्ये गर्दी न वाढविता परीक्षा ऑनलाइन घ्यावी.

- प्रकाश खाडे, चंद्रपूर