शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

१०३ अडते-व्यापारी आजपासून संपावर

By admin | Updated: July 26, 2016 01:01 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला.

चंद्रपूर बाजार समिती : ५० लाखांची उलाढाल थांबणार, भाजीपाला महागणारचंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी घेतला. या निर्णयाविरोधात राज्यात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनीही शासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवला असून मंगळवारपासून संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात भाजीपाला व फळे खरेदी-विक्री करणारे १०३ अडते व व्यापारांचा समावेश राहणार बाजार समितीची जवळपास ४० ते ५० लाखांची रोजची उलाढाल थांबण्याची चिन्ह आहेत.व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा नवीन अध्यादेश राज्य शासनाने काही दिवसांपुर्वीच काढला. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला मिळाले आहे. नवीन अध्यादेशानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे.१३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र चांगलीच कोडी होणार असून संपामुळे भाजीपाला व फळाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी) बैठकीतही निर्णय नाहीसंप टाळण्यासाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने काही दिवसांपुर्वी अडते व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मंगळवारी होणारा संप अटळ दिसून येत आहे. चंद्रपूर बाजार समितीत दररोज ४० ते ५० लाखांच्यावर भाजीपाला व फळांची खरेदी-विक्री होते. मात्र संप झाला तरी या उलाढालीवर परिणाम होणार आहे. संपापुर्वी अडते व व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.