शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

हुंड्यासाठी अडकले साडेसात हजार कुटुंब

By admin | Updated: November 18, 2014 22:52 IST

मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या

चंद्रपूर : मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या प्रकरणात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण किती खरे आणि किती खोटे याचा शोध घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, महिला तक्रार निवारण केंद्र तसेच भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरतर्फे काही कुटुंबाना जोडण्याचे काम सुरु आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे सत्य असले तरी काही महिलांकडून जाणूनबुजन पुरुषांना त्रास देण्याचा प्रकारही मागील काही वर्षांमध्ये समोर येत आहे. विविध कारण शोधून पुरुषांना फसविण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. सध्या ४९८(अ) या कलमाला गैरवापर होत असून पुरुष या कायद्याने भयभीत होत असल्याचे मत भारतीय परिवार बचाव संघटनेने व्यक्त केले आहे. कुटुंबात काही वाद झाल्यास महिला पोलीस स्टेशनचा रस्ता पकडतात. काही वेळा माहेरील लोकांकडूनही दबाव आण्यात येत आहे. या प्रकारामुळे कुटुंब जोडण्याऐवजी तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेच्या चंद्रपूर शाखेने मागील एक वर्षामध्ये तब्बल ५५ कुटुंबीयांना जोडण्याचे काम केले आहे. या व्यतिरिक्त पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रातूनही कुटुंब जोडण्याचे काम सुरु आहे. मात्र पाहिजे तसे यश अद्यापही आले नाही. त्यामुळे एकदा पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहत होते. महिलांनी अन्याय होत असल्यास नक्कीच ४९८ (अ) कलमाचा वापर करावा. मात्र विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने एखाद्या कुटुंबाला फसविण्याचा पाप करू नये, असे मत भारतीय परिवार बचाव संघनेच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)