शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

चार दिवसात १०० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकडक लॉकडाऊन : व्यापाऱ्यांचे १० कोटींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. या काळात चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गाचे नुकसान झाले आहे.देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दुध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती. या कालावधीत जिल्हाभर तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.त्यानंतर जून, जुलै या महिन्यात लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता आल्यामुळे बाजारपेठ पुन्हा फुलू लागली. आधी सायंकाळी ५ व नंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्यामुळे बाजारपेठेत चांगली वर्दळ दिसू लागली. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागले.अशातच जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला. रुग्ण दुपटीचा वेग वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत सापडले. सध्या एकूण बाधितांची संख्या २७६ झाली आहे. दररोज १०-१५ रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर शहरात पुन्हा लॉकडाऊन घोषित केले. १७ ते २१ जुलैपर्यंत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू व भाजी मार्केटही बंद ठेवण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून चंद्रपूर शहरातील कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक, किराना स्टोअर्स, भाजी मार्केट यासारखी अनेक दुकाने बंद आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. चंद्रपूर शहरात दररोज सर्व दुकाने मिळून कोट्यवधींची उलाढाल होते. मागील चार दिवसात सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे सुमारे १० कोटींचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले आहे. विशेष म्हणजे यातून सरकारलाही मिळणारा १० कोटींचा महसूल बुडाला आहे. याला चेंबर्स ऑफ कॉमर्सने दुजोरा दिला.शेतकऱ्यांचेही नुकसानचंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतात. हा भाजीपाला विक्रीसाठी बहुतांश शेतकरी चंद्रपुरात येतात. मात्र १७ ते २१ जुलैपर्यंत ठोक व चिल्लर असे दोन्ही भाजी मार्केट बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश असल्यामुळे व चंद्रपूरच्या सीमा बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला घेऊन चंद्रपुरात येणे जमले नाही. त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.चंद्रपुरात पाच हजार दुकानेचंद्रपूर शहरात जवळपास पाच हजार दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात किमान तीन ते पाच नोकर असतात. मात्र पाच दिवस सर्व दुकाने बंद असल्याने दुकान मालक व दुकानात काम करणारे नोकर, अशा सुमारे २५ हजार लोकांना मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या