शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

१०० कोटींचे सिंचन प्रकल्प धूळ खात

By admin | Updated: August 4, 2015 00:42 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्र: प्रकल्पांचा केवळ उद्योजकांना फायदाबी.यू. बोर्डेवार राजुराराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत. भेंडाळा सिंचन प्रकल्पावर करोडो खर्च होऊनसुद्धा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अद्याप फायद्याचा ठरला नाही.डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाले. परंतु कालवे पूर्ण न झाल्यामुळे हा प्रकल्पसुद्धा मातीमोल झाला आहे. सोनापूर टोमटा सिंचन प्रकल्प व पकडीगुड्डम मध्यम सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकानाच फायद्याचा ठरत आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न अजुनही संपुष्टात आलेला नाही. सिंचन वाढले पाहिजे, यासाठी या क्षेत्रामधील माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर यांनी सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. वर्धा नदीचे करोडो लिटर पाणी वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी अनेकवेळा मागणी केल्ज़ परंतु पाण्याचा साठा वाढविण्यासाठी अजुनही प्रयत्न करण्याची गरज आहे. आता या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा आहे. राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाची प्रकल्पे पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. या क्षेत्रात दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. उद्योजक मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुढील १० वर्षांत पाण्याचे नियोजन न झाल्यास राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. (शहर प्रतिनिधी)कालव्यांचा दर्जा निकृष्टकरोडो रुपये खर्च होऊनही मागील २० वर्षात पाण्यासाठी तयार झालेले सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, कालवे तयार झाले त्याचा दर्जासुद्धा तपासण्याची गरज आहे. सिंचनाचा प्रश्न गरीब शेतकऱ्यांशी जुळलेला आहे. शेतकरी रात्रंदिवस राबराब राबतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि सिंचनाच्या असुविधेमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे.पाण्याच्या पातळीतवाढ होणारराजुरा शहरातील पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी दोन कोटींचा निधी आणून राजुराच्या तलावाचे खोलिकरण केले. त्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत नक्कीच भर पडणार नाही.