शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचे सिंचन प्रकल्प धूळ खात

By admin | Updated: August 4, 2015 00:42 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्र: प्रकल्पांचा केवळ उद्योजकांना फायदाबी.यू. बोर्डेवार राजुराराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील १०० कोटींचे सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत. भेंडाळा सिंचन प्रकल्पावर करोडो खर्च होऊनसुद्धा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अद्याप फायद्याचा ठरला नाही.डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाले. परंतु कालवे पूर्ण न झाल्यामुळे हा प्रकल्पसुद्धा मातीमोल झाला आहे. सोनापूर टोमटा सिंचन प्रकल्प व पकडीगुड्डम मध्यम सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकानाच फायद्याचा ठरत आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न अजुनही संपुष्टात आलेला नाही. सिंचन वाढले पाहिजे, यासाठी या क्षेत्रामधील माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर यांनी सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. वर्धा नदीचे करोडो लिटर पाणी वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी अनेकवेळा मागणी केल्ज़ परंतु पाण्याचा साठा वाढविण्यासाठी अजुनही प्रयत्न करण्याची गरज आहे. आता या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा आहे. राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिंचनाची प्रकल्पे पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. या क्षेत्रात दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. उद्योजक मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुढील १० वर्षांत पाण्याचे नियोजन न झाल्यास राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. (शहर प्रतिनिधी)कालव्यांचा दर्जा निकृष्टकरोडो रुपये खर्च होऊनही मागील २० वर्षात पाण्यासाठी तयार झालेले सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, कालवे तयार झाले त्याचा दर्जासुद्धा तपासण्याची गरज आहे. सिंचनाचा प्रश्न गरीब शेतकऱ्यांशी जुळलेला आहे. शेतकरी रात्रंदिवस राबराब राबतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि सिंचनाच्या असुविधेमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे.पाण्याच्या पातळीतवाढ होणारराजुरा शहरातील पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी दोन कोटींचा निधी आणून राजुराच्या तलावाचे खोलिकरण केले. त्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत नक्कीच भर पडणार नाही.