शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

एका रुपयात १० लाखांचे सहाय्य

By admin | Updated: April 10, 2016 00:43 IST

सध्या परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट दरासोबत एक रुपया अतिरिक्त घेतला जात आहे.

परिवहन महामंडळाचा उपक्रम : आठवडाभरात चंद्रपूर आगारात दीड लाख जमापरिमल डोहणे चंद्रपूरसध्या परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट दरासोबत एक रुपया अतिरिक्त घेतला जात आहे. या एका रुपयात प्रवासादरम्यान अपघात झालाच तर मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रुपयांचा अपघाती सहायता निधी देण्यात येणार आहे. परिवहन महामंडळाने हा उपक्रम १ एप्रिलपासून सुरू केला आहे. यामुळे प्रवाशांना तर दिलासा मिळालाच आहे; सोबत महामंडळाचेही उत्पन्न वाढणार आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करताना झालेल्या अपघातात मृत किंवा जखमी प्रवाशांसाठी आर्थिक निधी वाढविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार महामंडळाच्या बसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना’ संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आहे. अपघात सहायता निधी योजनेपोटी प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटाच्या किमतीसोबतच एक रुपया अधिकचा घेतला जात आहे. या एक रुपयाचेही रितसर तिकीट प्रवाशांना दिले जात आहे. प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या या एक-एक रुपयांच्या बळावर एकट्या चंद्रपूर आगाराच्या तिजोरीत आठवडाभरात एक लाख ५८ हजार ३७१ रुपये जमा झाले आहे. या योजनेमुळे आर्थिक तोट्यात चाललेले एसटी महामंडळ सावरू शकणार आहे. यापूर्वी महामंडळातर्फे प्रवाशांना आर्थिक मदत देण्यात येत होती. प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक लाख रुपये, अपघातात कायम स्वरूपाचे अंशत: अपंगत्व आले तर ७५ हजार रुपये, सुधारणारी दुखापत असेल तर अशा जखमींना ५० हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येत होती. एसटी महामंडळ ही मदत देत असले तरी ती आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी तोकडीच होती. परंतु आता हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना सुरू करून यात मदत निधी सरसकट १० लाख रुपये करण्यात आला आहे. मासिक पासमध्येही तरतूदया योजनेमध्ये प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटासोबत या योजनेचे पैसे घेतले जाते. जर प्रवासी हा मासिक पासधारक असेल तर पास काढताना किंवा नूतनीकरण करताना त्याला ठराविक रकमेपेक्षा पाच रुपये अधिक द्यावे लागतील. जर प्रवासी हा त्रैमासिक पासधारक प्रवासी असेल तर पास काढताना किंवा पास नूतनीकरण करताना त्याला ठराविक रकमेपेक्षा पंधरा रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहे. संपूर्ण बसच एखाद्या कार्यक्रमासाठी भाड्याने घेतली तर अशावेळी करार करतानाच नियोजित रकमेच्या ५० रुपये अधिक द्यावे लागणार आहे. या भाड्याने केलेल्या बसला अपघात झाला व कुणाचा मृत्यू झाला तर त्याला योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे.अनेक वाहक योजनेपासून अनभिज्ञएक रुपया अतिरिक्त कशाचा, याबाबत अनेक वाहकाला प्रवाशांनी विचारले असता १ एप्रिलपासून तिकीट दर वाढले, असे वाहकांकडून सांगितले जात आहे. यावरून या योजनेबाबत वाहक अनभिज्ञ असून अनेक प्रवासीही अनभिज्ञ आहेत.