शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

१० लाखांचे रोपवन गायब

By admin | Updated: May 12, 2017 02:20 IST

निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

कुंपणानेच शेत खाल्ले : गोंडी विहिरगाव येथील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मूल : निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अंमलात आणला. मात्र वन विभागातील कर्मचारी व अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास बाधा निर्माण होत असल्याचा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये बघितल्यानंतर दिसून येते. रोपवनावर १० लाख रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष झाल्याने रोपे करपली. आजच्या स्थितीत सदर जागेवर एकही रोप नसून झाडे झुडपे वाढली असल्याचे दिसून येते. यावरुन कुंपनानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शासन स्तरावर रोपवन लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये जुलै २०१० मध्ये ५० हेक्टर जमिनीवर मिश्र रोपे लावण्यात आली. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने करण्यात आलेल्या या रोपवनासाठी पाच वर्षांपर्यंत १० लाख रुपये खर्च करण्यात आले. सतत पाच वर्षे रोपावर खर्च निधी दाखविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्या जमिनीवर एकही रोपण केलेला वृक्ष आढळत नसल्याने सतत पाच वर्षे कुठल्या रोपावर निधी खर्च केला, हा प्रश्नच आहे. या रोपवनासाठी रोप आणणे, खड्डे खोदणे, कुंपन करणे आदींवर लाखो रुपये करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने सदर जागेवर मिश्र रोपे लावण्यासाठी वनविकास यंत्रणा चंद्रपूरच्या वतीने ३१ मार्च २०१० ला समितीला दोन ६१ हजार २५० रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यानंतर २ जुलै २०११ ला ३ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. २१ मार्च २०१४ पर्यंत १० लाख २६ हजार १२४ रुपये प्राप्त झाले. सतत पाच वर्षे रोपावर निधी खर्च दाखविण्यात आला. रोपे वाढविण्यासाठी प्रयत्नच झाला नसल्याचे दिसून येते. आजच्या स्थितीत मूल तालुक्यातील गोंडी विहीरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मधील ५० हेक्टर संरक्षित वनामध्ये एकही रोप आढळून येत नाही. आजच्या स्थितीत एकही रोप दिसत नसल्याने कुंपनानेच शेत खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील या गोंडी विहीरगाव येथे असा प्रकार होत असेल तर इतरही ठिकाणी काय स्थिती असावी, याचा विचार न केलेलाच बरा.