शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

१० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

By admin | Updated: April 19, 2017 00:44 IST

औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे,....

पाच वर्षांपासून सुरू आहे काम : गडचांदूरकरांना अतिरिक्त पाण्यासाठी प्रतीक्षागडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातून अंमलनाला धरणावरून गडचांदूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला २० नोव्हेंबर २०१७ ला मंजुरी मिळाली. १० करोड ३५ लाख ४२ हजार रुपयाच्या योजनेला १२ जानेवारी २०१२ ला सुरुवात झाली.सदर योजना ११ जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरीत करावयाची होती. मात्र प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने अतिरीक्त पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. गडचांदूर वाढीव पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत सात कोटी ६८ लाख २९ हजार रुपये खर्च झाले आहे. अंमलनाला धरणातील इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल, कनेक्टीव वेल, जॅक वेल, पंप हाऊस, अप्रोच ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.अशुद्ध पाणी पंपीग मशीनरी व उर्ध्ववाहीनीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून चाचणी बाकी आहे. ब्रेक प्रेशर टँकचे काम पूर्ण झाले आहे. अशुद्ध पाणी गुरुत्वनलीकाचे काम ८५ टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. गडचांदूर शहरातील साईशांतीनगर येथे पाण्याच्या उंच टाकीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम ५० टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. शुद्ध पाणी पंपीग मशीनरी ३० एचपी व पाच एचपी पंपाचा पुरवठा अद्याप पर्यंत झाला नाही. शुद्ध पाणी उर्ध्व नलीकाचे काम ४० टक्के झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम ६४ टक्के झाले आहे. आरसीसी पंप स्लब डिस्पोजल कवेक्शन, पंपीग मशीनरी स्लज पाईप लाईन स्लजच्या कामाला सुरुवातच झाली नाही. सर्वेक्षण भिंत, ट्रायल रन यासारख्या किरकोळ कामाला सुरुवातच झाली नाही.कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे. (वार्ताहर)येत्या सहा महिन्यात पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरण केली जाईल. दिलेल्या मुदतीत संबंधीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदारावर चार हजार रुपये प्रती दिवस दंड ठोठावला आहे. - के. एन. शेख , शाखा अभियंता गडचांदूरनगर परिषदेने प्राधिकरणाला वारंवार पत्र देऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यास सूचविले आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती चांगली योग्य असल्याची खात्री झाल्याशिवाय न.प. हस्तांतर करुन घेणार नाही.- संजय जाधव, मुख्याधिकारी न.प. गडचांदूरपाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचेशहरात टाकलेले पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे असून पाणीपुरवठा केल्यानंतर किती दिवस टिकेल, याची शंका आहे.- सचिन भोयर, उपाध्यक्ष न.प. गडचांदूर