शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

By admin | Updated: April 19, 2017 00:44 IST

औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे,....

पाच वर्षांपासून सुरू आहे काम : गडचांदूरकरांना अतिरिक्त पाण्यासाठी प्रतीक्षागडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातून अंमलनाला धरणावरून गडचांदूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला २० नोव्हेंबर २०१७ ला मंजुरी मिळाली. १० करोड ३५ लाख ४२ हजार रुपयाच्या योजनेला १२ जानेवारी २०१२ ला सुरुवात झाली.सदर योजना ११ जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरीत करावयाची होती. मात्र प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने अतिरीक्त पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. गडचांदूर वाढीव पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत सात कोटी ६८ लाख २९ हजार रुपये खर्च झाले आहे. अंमलनाला धरणातील इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल, कनेक्टीव वेल, जॅक वेल, पंप हाऊस, अप्रोच ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.अशुद्ध पाणी पंपीग मशीनरी व उर्ध्ववाहीनीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून चाचणी बाकी आहे. ब्रेक प्रेशर टँकचे काम पूर्ण झाले आहे. अशुद्ध पाणी गुरुत्वनलीकाचे काम ८५ टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. गडचांदूर शहरातील साईशांतीनगर येथे पाण्याच्या उंच टाकीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम ५० टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. शुद्ध पाणी पंपीग मशीनरी ३० एचपी व पाच एचपी पंपाचा पुरवठा अद्याप पर्यंत झाला नाही. शुद्ध पाणी उर्ध्व नलीकाचे काम ४० टक्के झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम ६४ टक्के झाले आहे. आरसीसी पंप स्लब डिस्पोजल कवेक्शन, पंपीग मशीनरी स्लज पाईप लाईन स्लजच्या कामाला सुरुवातच झाली नाही. सर्वेक्षण भिंत, ट्रायल रन यासारख्या किरकोळ कामाला सुरुवातच झाली नाही.कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे. (वार्ताहर)येत्या सहा महिन्यात पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरण केली जाईल. दिलेल्या मुदतीत संबंधीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदारावर चार हजार रुपये प्रती दिवस दंड ठोठावला आहे. - के. एन. शेख , शाखा अभियंता गडचांदूरनगर परिषदेने प्राधिकरणाला वारंवार पत्र देऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यास सूचविले आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती चांगली योग्य असल्याची खात्री झाल्याशिवाय न.प. हस्तांतर करुन घेणार नाही.- संजय जाधव, मुख्याधिकारी न.प. गडचांदूरपाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचेशहरात टाकलेले पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे असून पाणीपुरवठा केल्यानंतर किती दिवस टिकेल, याची शंका आहे.- सचिन भोयर, उपाध्यक्ष न.प. गडचांदूर