शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आगीत १० गोठे जळून खाक

By admin | Updated: May 23, 2015 01:22 IST

राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली.

१२ लाखांचे नुकसान : दोन बैल जखमी; एका वासराचा मृत्यूगोवरी : राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली. नागरिकांनी मिळेल त्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्हाळा असल्यामुळे आग आणखी वाढत गेली. तब्बल १० गोठ्यांना आगीने कवेत घेतले. या आगीत तब्बल १० लाखांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढविले आहे.या घटनेत सर्वप्रथम हरिश्चंद्र कावळे यांच्या गोठ्याला आग लागली. मात्र ही आग लागल्याचे लक्षात आले तेव्हा बाजूला असलेल्या विजय आमने, दत्तु बोढे, दशरथ खिरटकर, मुर्लीधर सदाफळे, बंडू पिंपळकर, बाबा कावळे, मुर्लीधर वांढरे, मुर्लीधर पिंपळकर तर शंकर झिल्लेवार यांच्या घरातील गोठ्यांनाही आग लागली. पाहता पाहता आगीने जनावरांचे दहा गोठे कवेत घेतल्यानंतर पाण्यासाठी गावकऱ्यांनी धावाधाव केली. या आगीत दत्तु बोढे यांच्या गोठ्यातील एका वासराचा जळून मृत्यू झाला तर मुर्लीधर सदाफळे यांचे गोठ्यात बांधून असलेले दोन बैल जखमी झाले. गोठ्यात कडबा, कुटार, वखर, नांगर, मोटरपंप पाईप, शेती उपयोगी सर्व अवजारे जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस असलेले सर्व गोठे क्षणार्धात जळून खाक झाले. मात्र यावेळी वाऱ्याचा वेग मंदावल्याने शाळेला आग लागली नाही. शंकर झिलेवार यांच्या घराला आगीने कवेत घेण्याआधीच गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. किसन एकरे यांचे घर आगीतून बचावले. आग विझविण्यासाठी राजुरा, बल्लारपूर व अंबुजा सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीत दहा गोठे जळून खाक झाले होते. गोठ्याला लागून असलेल्या समाज भवानाच्या इमारतीत बाबा कावळे यांचे रासायनिक खताचे गोडावून होते ते ग्रामपंचायतीने किरायाने दिले होते. आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा तलाठी वी.बी. शेख यांनी केला. यावेळी ग्रामसेवक सचिन विरुटकर व गावकरी उपस्थित होते. ही आग शार्टशर्किटने लागली.(वार्ताहर) पाचगाव येथेही आगपाचगाव येथे लागलेल्या आगीत अनिल कुरवटकर व महादेव कुरवटकर यांचे घर जळाले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. यात त्यांचेही मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.