शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

१ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: December 3, 2015 01:14 IST

सरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते.

सुधारित पैसेवारीसाठी प्रशासनाचे पत्र : चिमूर, भद्रावती, जिवती तालुके वगळलेगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरसरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने १ हजार ८३६ गावांपैकी १ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचा सुधारित अहवाल महसूल व वनविभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. त्यामुळे भविष्यात ही गावे दुष्काळग्रस्त यादीत येण्याची आशा बळावली आहे.चंद्रपूर जिल्हा धान, कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचा जिल्हा म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. मात्र यंदा अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धान पीक पार वाया गेले. कपाशीवरही लाल्या आल्याने या पिकानेही दगा दिला आहे. सोयाबीनचीही उतारी बरीच घटल्याने जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळाशी लढत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापूर्वी सरकाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. यामुळे प्रचंड रोष व्यक्त होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी महसूल यंत्रणेने पाठविलेल्या यादीनुसारचे पैसेवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगितल्याने जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवरील रोष वाढला होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी अलीकडेच सरकारला कळविली आहे. त्यात जिल्ह्यातील १ हजार ६८१ खरिप गावांपैकी १ हजार १९६ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाखाली दर्शविली आहे.जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून खरिपांची गावे एक हजार ६८१ आहेत. तर, १८ गावे पीक नसलेली आहेत. त्यापैकी ४६७ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविली असून उर्वारित एक हजार १९६ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी दाखविली आहे.