शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बाप्पाच्या निरोपासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधक कारवाई केली. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. यासाठी आज अनेक ठिकाणी कठडे लावण्यात आले.

ठळक मुद्देबंदोबस्तासाठी एक हजार पोलिसांचा ताफा तैनात : मुख्य मार्गावर उभारले टॉवर, मिरवणुकीवर सीसीटीव्ही वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहा दिवस गणरायाची आराधना केल्यानंतर गुरूवारी चंद्रपुरात ढोलताश्यांच्या गजरात विसर्जन होणार आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ५० पोलीस उपनिरीक्षकांसह १ हजार पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे. गणेश भक्तांना महाप्रसाद, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी तयारी पूर्ण केली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी बुधवारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मुख्य मार्गावर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. बल्लारपूर व वरोरा शहरातही आज मोठ्या उत्साहात बाप्पाचे विसर्जन होणार आहे.विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधक कारवाई केली. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. यासाठी आज अनेक ठिकाणी कठडे लावण्यात आले.गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सावरकर चौक, बसस्थानक चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक, पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्ग, प्रियदर्शिनी चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता वाहनांसाठी बंद राहील. नागपूरकडून येणारी आणि बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व वाहने वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्पमार्गे मूल आणि बल्लारपूरकडे रवाना होतील. मूल व बल्लारपूरकडून येणारी तसेच नागपूरकडे जाणारी वाहने बंगाली कॅम्प, सावरकर चौकातून उड्डाणपूलावरून नागपूर मार्गाने पुढे जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य वर्दळीच्या चौकात आज सायंकाळी बॅरिकेटस् ठेवण्यात आले. मिरवणुकीदरम्यान वादविवाद गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर ठाणे, रामनगर व दुर्गापूर येथील ठाणेदार त्यांच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकांऱ्याच्या संपर्कात असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला. ढोलताशा पथकांमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.पावसामुळे आनंदावर विरजनशहरातील रामाळा तलावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन केल्या जाणार आहे. शिवाय घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली. तलावर बोट व वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. चंद्रपुरातील गणेश मंडळांकडून दरवर्षी आकर्षक व प्रबोधनपर देखावे तयार केल्या जातात. परंतु, बुधवारी दुपारी २ वाजतापासून पाऊस सुरू झाल्याने कार्यकर्ते व नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी