शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नोकरी सोडून व्यवसाय करु का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:12 IST

असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर निर्णय कसा घ्याल?

ठळक मुद्देनिर्णय घेताना माझा निर्णय चुकला तर काय अशी परिणामांची यादी करणं आणि कोणाचा तरी आपल्या निर्णयासाठी पाठिंबा मिळवणं हे कटाक्षाने टाळा.

-योगिता तोडकर

एक दिवस संदीप माझ्याकडे आला, खूप अस्वस्थ होता. मला म्हटला नोकरी सोडून व्यवसाय करायची माझी इच्छा आहे. घरातल्यांचा मी व्यवसाय करावा या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. त्यांचे म्हणणे आहे त्यात मोठी जोखीम आहे. जर तो चालला नाही तर सगळ्याच बाजूंनी, आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक नुकसान होईल.  खूपजणांशी चर्चा केली, खूप विचार केला, पण कळत नाहीये काय करावं. गोंधळून गेलोय.

मी त्याला म्हटलं कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामांची भीती हे निश्चितच आहे. पण आपण जेंव्हा असं म्हणतो की, मी निर्णय घेण्यासाठी विचार करतोय तेंव्हा हे पडताळून पाहावं की आपण त्याच्या वाटणार्‍या परिणामांच्या  भीतीभोवती घुटमळतोय की निर्णयाबद्दल चारही बाजूंनी खरंच विचार करतोय.

निर्णय घेताना सगळ्यात अवघड गोष्ट असते ती म्हणजे आपला निर्णय बरोबर आहे का हे ठरवणं. निर्णय हा बरोबर किंवा चूक नसतो. निर्णय हा निर्णय असतो. फक्त तो घेण्यासाठी त्याबददलची योग्य माहिती मिळवून त्यावर काम करणे यासाठी हिम्मत लागते. बहुतेकवेळा वेळा आपण जे करतोय त्यासाठी आपल्या जवळपास असणार्‍यांशी चर्चा करतो, व आपण करतोय ते योग्य आहे असे इतरांनी म्हणण्याची वाट पाहतो.

त्यामुळे निर्णय घेताना माझा निर्णय चुकला तर त्याच्या परिणामांची यादी करणं व कोणाचा तरी निर्णयासाठी पाठिंबा मिळवणं हे कटाक्षाने टाळ. कारण अशा वेळेस मन त्यातच गुंतून राहणे पसंत करते.

कोणताही निर्णय घेताना परिणामांची जबाबदारी घेणं म्हणजे हिम्मत. त्यासाठी निर्णयापूर्वी आपल्याला नेमके काय हवे आहे हे ठरव. त्याचप्रमाणे निर्णय घेताना तुयाकडे  काय पर्याय आहेत हे तपासून पहा. निर्णय घेतल्यावर त्याचे कोणावर व काय परिणाम होतील याचा अभ्यास कर. त्याचप्रमाणे होणारे दुष्परिणाम काळाच्या ओघात भरून निघू शकतील काय हेदेखील पहा. व या सर्व माहितीवर आधारित  निर्णय घे.

मंडळी संदीप प्रमाणेच आपल्यालाही आयुष्याच्या विविध भूमिकांमध्ये निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय घेण्याची हिम्मत म्हणजे विविध पर्याय पडताळणे, पर्यायांचा परिणाम तपासणे, त्यासाठीचे मार्ग शोधणे व त्याची जबाबदारी घेणे इतकेच. यापलीकडे फार वेगळे असे काहीच नाही.

 

( लेखिका समुपदेशक आहेत.)