शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:46 IST

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं. केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा, असं स्वत:ला आणि इतरांना सांगण्याची धमक आहे का आपल्यात?

ठळक मुद्देसतत कारणं सांगत राहिलं की, कामं पुढं ढकलण्याची सवय लागते.आपण आळशी बनतो, खोटं बोलतो.आपली कार्यक्षमता तर वाया जातेच, विश्वासार्हताही कमी होते.

-चिन्मय लेले

थ्री इडियटमधल्या व्हायरसचं ते वाक्य ऐकलंय ना? काय चुकीचं म्हणतात ते महाशय विरू सहस्त्रबुद्धे? ते म्हणतात ते खरंच तर आहे. ते विचारतात, वडील आजारी होते म्हणून खाना-पिना-नहाना-सांस लेना या गोष्टी सोडल्या का? नाही ना,  मग ’’मी डिस्टर्ब होतो’’ म्हणून अभ्यास करणं, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करणं, आणि करता येणं शक्य असलेल्या अनेक गोष्टी स्वतर्‍चे लाड करत न करणं, जे केलं नाही, टाळलंच त्यासाठी कारणं सांगत राहतो, हे का करतो आपण?  जी माणसं सतत कारणं सांगतात, ती कधीही यशस्वी होत नाही, हा जगाचा नियम आहे.

व्हायरसच्या त्या वाक्याचं वाईट वाटतं, म्हणजे अगदी कोरडेठाक दगड होऊन फिलिंग्ज डिलीटच मारून टाकायच्या का असा प्रश्न पडलाच असेल कुणाला? तर विचार करा, खरंच कारणं नाही देत आपण चालढकल करतो त्या कामांसाठी?

 यार, कबूल करून टाकू ना, की फार कारणं सांगतो आपण. भयंकर एक्सक्यूज देतो. हे झालं म्हणून तसं झालं, ढिमकं झालं म्हणून मी टिमकं केलं.

ट्राफिक जाम होतं म्हणून आज मला लेट झाला.

घडय़ाळाचा गजरच झाला नाही म्हणून उशीरा उठलो.

मी नसतेच चिडत कधी, पण माणसं डोक्यात जातात म्हणून मी वसवसते.

मी शांतच असतो, पण लोकंच अशी वागतात की राग येतोच, मग बोलतो मी काहीतरी, लोकांना आधी धड बोलायला शिकवायला पाहिजे.

-कित्त्ती कारणं.!

जमेल तेव्हा, जमेल तशी कारणं देत आपली मान सोडवून घेण्याची कसरत करायला एकदम सरावलेलो असतो आपण.

नुस्ती कारणं सांगतो आणि जे जमलं नाही त्याचं खापर त्या कारणांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतो.

‘कारणे सांगा’ विषयात मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायला लागतात. आणि जे करणं शक्य असतं ते करणं आपण ‘कारणा’त घुसडून कधीच करत नाही.

म्हणजे बघा मॅच हरली म्हणून आपण विराट कोहली देतो ती कारणं खरी मानतो का? ते जाऊ द्या, आईबाबा आपल्याला एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा त्यांची कारणं खरी असली तरी आपल्याला पटतात का?

मग आपणच कोण असे तिसमारखां लागून गेलोय की, आपण सतत एक्सक्यूज देतो?

ही सतत एक्सक्यूज देण्याची सवयच समजा सोडून दिली तर.?

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं.

जे केलं ते केलं, जे नाही केलं  ते नाहीच करणार जा.

असा उद्धट अ‍ॅटिटय़ूड एकवेळ परवडला पण ही कारणांची लडच फूस्स करून टाकायला हवी.

आणि एखाद्या दिवशी झालाच उशीर तर सांगू ना बिन्धास की झोपून राहिलो गाढवासारखा.झाला उशीर!

नाहीच झालं काम तर सांगू स्वतर्‍लाही की आपण आळशी आहोत, हे असेच वागलो,  तर एकदिवस फुकट मरू.

किती सोप्पं.

आपली जबाबदारी आपण घेऊन मोकळं व्हायचं. काही कारणं सांगायची नाहीत, काही झंझट नाही, काही खुलासे नाहीत.

बंद सगळं. नो एक्सक्यूजेस! ही एक सवय आपल्याला यशाच्या दिशेनं किमान काही पाऊलं तरी पुढं नेऊ शकते