शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:46 IST

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं. केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा, असं स्वत:ला आणि इतरांना सांगण्याची धमक आहे का आपल्यात?

ठळक मुद्देसतत कारणं सांगत राहिलं की, कामं पुढं ढकलण्याची सवय लागते.आपण आळशी बनतो, खोटं बोलतो.आपली कार्यक्षमता तर वाया जातेच, विश्वासार्हताही कमी होते.

-चिन्मय लेले

थ्री इडियटमधल्या व्हायरसचं ते वाक्य ऐकलंय ना? काय चुकीचं म्हणतात ते महाशय विरू सहस्त्रबुद्धे? ते म्हणतात ते खरंच तर आहे. ते विचारतात, वडील आजारी होते म्हणून खाना-पिना-नहाना-सांस लेना या गोष्टी सोडल्या का? नाही ना,  मग ’’मी डिस्टर्ब होतो’’ म्हणून अभ्यास करणं, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करणं, आणि करता येणं शक्य असलेल्या अनेक गोष्टी स्वतर्‍चे लाड करत न करणं, जे केलं नाही, टाळलंच त्यासाठी कारणं सांगत राहतो, हे का करतो आपण?  जी माणसं सतत कारणं सांगतात, ती कधीही यशस्वी होत नाही, हा जगाचा नियम आहे.

व्हायरसच्या त्या वाक्याचं वाईट वाटतं, म्हणजे अगदी कोरडेठाक दगड होऊन फिलिंग्ज डिलीटच मारून टाकायच्या का असा प्रश्न पडलाच असेल कुणाला? तर विचार करा, खरंच कारणं नाही देत आपण चालढकल करतो त्या कामांसाठी?

 यार, कबूल करून टाकू ना, की फार कारणं सांगतो आपण. भयंकर एक्सक्यूज देतो. हे झालं म्हणून तसं झालं, ढिमकं झालं म्हणून मी टिमकं केलं.

ट्राफिक जाम होतं म्हणून आज मला लेट झाला.

घडय़ाळाचा गजरच झाला नाही म्हणून उशीरा उठलो.

मी नसतेच चिडत कधी, पण माणसं डोक्यात जातात म्हणून मी वसवसते.

मी शांतच असतो, पण लोकंच अशी वागतात की राग येतोच, मग बोलतो मी काहीतरी, लोकांना आधी धड बोलायला शिकवायला पाहिजे.

-कित्त्ती कारणं.!

जमेल तेव्हा, जमेल तशी कारणं देत आपली मान सोडवून घेण्याची कसरत करायला एकदम सरावलेलो असतो आपण.

नुस्ती कारणं सांगतो आणि जे जमलं नाही त्याचं खापर त्या कारणांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतो.

‘कारणे सांगा’ विषयात मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायला लागतात. आणि जे करणं शक्य असतं ते करणं आपण ‘कारणा’त घुसडून कधीच करत नाही.

म्हणजे बघा मॅच हरली म्हणून आपण विराट कोहली देतो ती कारणं खरी मानतो का? ते जाऊ द्या, आईबाबा आपल्याला एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा त्यांची कारणं खरी असली तरी आपल्याला पटतात का?

मग आपणच कोण असे तिसमारखां लागून गेलोय की, आपण सतत एक्सक्यूज देतो?

ही सतत एक्सक्यूज देण्याची सवयच समजा सोडून दिली तर.?

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं.

जे केलं ते केलं, जे नाही केलं  ते नाहीच करणार जा.

असा उद्धट अ‍ॅटिटय़ूड एकवेळ परवडला पण ही कारणांची लडच फूस्स करून टाकायला हवी.

आणि एखाद्या दिवशी झालाच उशीर तर सांगू ना बिन्धास की झोपून राहिलो गाढवासारखा.झाला उशीर!

नाहीच झालं काम तर सांगू स्वतर्‍लाही की आपण आळशी आहोत, हे असेच वागलो,  तर एकदिवस फुकट मरू.

किती सोप्पं.

आपली जबाबदारी आपण घेऊन मोकळं व्हायचं. काही कारणं सांगायची नाहीत, काही झंझट नाही, काही खुलासे नाहीत.

बंद सगळं. नो एक्सक्यूजेस! ही एक सवय आपल्याला यशाच्या दिशेनं किमान काही पाऊलं तरी पुढं नेऊ शकते