शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Excuse: कारणं सांगत पळवाटा शोधताय? मग तुमचं करिअर ढपणारच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:46 IST

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं. केलं ते केलं, जे नाही केलं ते नाहीच करणार जा, असं स्वत:ला आणि इतरांना सांगण्याची धमक आहे का आपल्यात?

ठळक मुद्देसतत कारणं सांगत राहिलं की, कामं पुढं ढकलण्याची सवय लागते.आपण आळशी बनतो, खोटं बोलतो.आपली कार्यक्षमता तर वाया जातेच, विश्वासार्हताही कमी होते.

-चिन्मय लेले

थ्री इडियटमधल्या व्हायरसचं ते वाक्य ऐकलंय ना? काय चुकीचं म्हणतात ते महाशय विरू सहस्त्रबुद्धे? ते म्हणतात ते खरंच तर आहे. ते विचारतात, वडील आजारी होते म्हणून खाना-पिना-नहाना-सांस लेना या गोष्टी सोडल्या का? नाही ना,  मग ’’मी डिस्टर्ब होतो’’ म्हणून अभ्यास करणं, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करणं, आणि करता येणं शक्य असलेल्या अनेक गोष्टी स्वतर्‍चे लाड करत न करणं, जे केलं नाही, टाळलंच त्यासाठी कारणं सांगत राहतो, हे का करतो आपण?  जी माणसं सतत कारणं सांगतात, ती कधीही यशस्वी होत नाही, हा जगाचा नियम आहे.

व्हायरसच्या त्या वाक्याचं वाईट वाटतं, म्हणजे अगदी कोरडेठाक दगड होऊन फिलिंग्ज डिलीटच मारून टाकायच्या का असा प्रश्न पडलाच असेल कुणाला? तर विचार करा, खरंच कारणं नाही देत आपण चालढकल करतो त्या कामांसाठी?

 यार, कबूल करून टाकू ना, की फार कारणं सांगतो आपण. भयंकर एक्सक्यूज देतो. हे झालं म्हणून तसं झालं, ढिमकं झालं म्हणून मी टिमकं केलं.

ट्राफिक जाम होतं म्हणून आज मला लेट झाला.

घडय़ाळाचा गजरच झाला नाही म्हणून उशीरा उठलो.

मी नसतेच चिडत कधी, पण माणसं डोक्यात जातात म्हणून मी वसवसते.

मी शांतच असतो, पण लोकंच अशी वागतात की राग येतोच, मग बोलतो मी काहीतरी, लोकांना आधी धड बोलायला शिकवायला पाहिजे.

-कित्त्ती कारणं.!

जमेल तेव्हा, जमेल तशी कारणं देत आपली मान सोडवून घेण्याची कसरत करायला एकदम सरावलेलो असतो आपण.

नुस्ती कारणं सांगतो आणि जे जमलं नाही त्याचं खापर त्या कारणांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतो.

‘कारणे सांगा’ विषयात मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायला लागतात. आणि जे करणं शक्य असतं ते करणं आपण ‘कारणा’त घुसडून कधीच करत नाही.

म्हणजे बघा मॅच हरली म्हणून आपण विराट कोहली देतो ती कारणं खरी मानतो का? ते जाऊ द्या, आईबाबा आपल्याला एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा त्यांची कारणं खरी असली तरी आपल्याला पटतात का?

मग आपणच कोण असे तिसमारखां लागून गेलोय की, आपण सतत एक्सक्यूज देतो?

ही सतत एक्सक्यूज देण्याची सवयच समजा सोडून दिली तर.?

जे जमलं ते केलं, जे नाही जमलं ते नाही जमलं.

जे केलं ते केलं, जे नाही केलं  ते नाहीच करणार जा.

असा उद्धट अ‍ॅटिटय़ूड एकवेळ परवडला पण ही कारणांची लडच फूस्स करून टाकायला हवी.

आणि एखाद्या दिवशी झालाच उशीर तर सांगू ना बिन्धास की झोपून राहिलो गाढवासारखा.झाला उशीर!

नाहीच झालं काम तर सांगू स्वतर्‍लाही की आपण आळशी आहोत, हे असेच वागलो,  तर एकदिवस फुकट मरू.

किती सोप्पं.

आपली जबाबदारी आपण घेऊन मोकळं व्हायचं. काही कारणं सांगायची नाहीत, काही झंझट नाही, काही खुलासे नाहीत.

बंद सगळं. नो एक्सक्यूजेस! ही एक सवय आपल्याला यशाच्या दिशेनं किमान काही पाऊलं तरी पुढं नेऊ शकते