शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा देताय? ‘प्लॅन बी’ तयार ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 16:27 IST

स्पर्धा परीक्षेत आपल्याला हवं तेच पद मिळेल असं काही नाही, अपयश पचवायची तयारी कुणी करायची?

ठळक मुद्देग्लॅमर, यशस्वी कहाण्या, पदाची आकांक्षा याच गोष्टींना भुलून स्पर्धा परीक्षा देऊ नका. आपल्याला जगण्याची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे हे पण लक्षात ठेवलेलं बरं!

 - अजय अर्जुन नरळे

स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हणजे एक खूप मोठ जंगलच आहे. या जंगलात जाऊन वाघाची शिकार करणारे खूप कमी. ते जमणारे शिकारीच या जंगलात यशस्वी होतात. खूप मोठी स्वप्न घेऊन विद्यार्थी या जंगलात प्रवेश करतात परंतु त्यापैकी खूपच कमी विद्यार्थी यशस्वी होतात. अपयश पदरी पडलेल्यांकडे नोकरी-व्यवसायाचा दुसरा कोणताच पर्याय नसेल तर पश्याताप करून घेण्याशिवाय हातात काहीच शिल्लक राहत नाही.

सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेतून जेवढी पदे शासन भरते त्याच्या कित्येक पटीने जास्त विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. ज्या विध्याथ्र्याना या परीक्षेतून चांगली पदे मिळाली तेच विद्यार्थी सत्कार, भाषण, व्याख्याने या माध्यमातून समाजासमोर येतात व त्यांना मिळणार्‍या  सुविधा व सन्मान याची कल्पना करून बहुतेक विद्यार्थी या क्षेत्नाकडे आकर्षित होतात. परंतु याच क्षेत्नात अपयशी ठरलेल्या विद्याथ्र्याकडे पहायला कुणाला वेळही नसतो. त्यांच्या वाट्याला फक्त उपहास, विटंबना येते, आणि या परिस्थितीत त्यांच्याकडे आर्थिक कमाईचा दुसरा मार्ग नसेल तर त्यांची परिस्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशीच होते.

आजच्या तरु णाईने स्पर्धा परीक्षा क्षेत्न हे फक्त सन्मान मिळविण्यासाठी किंवा सुख-सुविधा मिळवण्यासाठी किंवा यशस्वी लोकांची भाषणं ऐकून, सत्कार पाहून निवडू नये. आयुष्यभर चांगले जीवन जगण्यासाठी हा एकच पर्याय नसतो. स्पर्धा परीक्षेतून मिळणारी पदे कोणती आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे तसेच त्या जबाबदा-या कर्तव्ये पार पाडण्यात आपण यशस्वी होऊ का व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या सर्वांसाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी आहे का याचा विचार करूनच या क्षेत्नात प्रवेश करावा.  आजकाल खूप तरु ण-तरु णी पदवी घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा व्यवसाय सुरु  करता येत नाही म्हणून या क्षेत्नाकडे वळताना दिसत आहेत.

या क्षेत्नात असणारी स्पर्धा व परीक्षेची अनियमितता (अलीकडील काळात परीक्षा काही प्रमाणात वेळेत होत आहेत, परंतु पदसंख्येचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे) पाहता मनाची पूर्ण तयारी करून आलेला विद्यार्थीच येथे यशस्वी होतो. या क्षेत्नात येणार्‍या प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपण प्रशासनातील सर्वात वरच्या पातळीवर अधिकारी व्हावे परंतु प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत नाहीत. सद्यस्थितीचा विचार करता सर्वप्रथम जे पद मिळेल ते घेऊन त्यानंतर पुढील पदासाठी अजून जोमाने तयारी करणेच योग्य आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

एका बाजूला मोठ्या पदावर निवड झालेल्यांच्या सुख-सुविधा, मान-सन्मान याचा विचार केला जातो परंतु त्याच वेळी ज्यांच्या पदरी अपयश पडले आहे त्यांची समाजात जी घुसमट होते त्याचा कोणी विचार करताना दिसत नाही. या क्षेत्नात जे यशस्वी होतात त्यांना त्यांच्या यशस्वी होण्याची कारणे सांगावी लागत नाहीत. परंतु जे अयशस्वी होतात त्यांची कारणे ते सांगू शकत नाहीत. समाज अयशस्वी लोकांची कोणतीही कारणे ऐकायला तयार नसतो. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्वानी अपयश आले तर आपला पर्याय कोणता असावा याची तयारी करून ठेवावी. या क्षेत्नात यशस्वी होऊच असे ठरवून प्रत्येकजण इथे येत असतो, पण समजा नाहीच जमलं तर पुढे काय याचा विचारही मनाशी असलेला बरा!

 या क्षेत्नात मला हेच पद हवे आहे आणी ते मिळेपर्यंत मी कोणतेही पद स्वीकारणार नाही असे करण्याऐवजी सर्वप्रथम कोणते पद मिळेल ते घेऊन आपले अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी तयारी करावी. यश मिळाले तर सर्व काही कल्पनेप्रमाणे होईलच परंतु अपयश आले तरी  हाताशी पर्याय असेल. जगणं आपली परीक्षा पाहणार नाही.

 

 (नगरपरिषद अभियंता, सांगोले नगरपरिषद, जि-सोलापूर)