शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

नोकरी करु की शिक्षण पूर्ण करु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 16:32 IST

हातातली नोकरी सोडून पुढे शिकावं का, असा टप्पा आला तर?

ठळक मुद्देनिर्णय कुठलाही घेतला तरी फायदे तोटे आहेतच, आपली प्रायॉरिटी काय हे आपण ठरवायचं.

- योगिता तोडकर 

प्राजक्ता माझ्याकडे आलीच गंभीर चेहर्याने. 27 वर्षाची चुणचुणीत प्राजक्ता नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करत होती. तिला पीएचडीसाठी परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला होता व शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. ती म्हणाली, ‘चांगली नोकरी सोडून मी पीएचडीचा विचार करावा का, की नोकरीच चालू ठेवावी, कळतच नाहीये. जर मी जायचं ठरवलं तर माझ्या वैयिक्तक, कौटुंबिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील, पण पीएचडी नंतर चांगली नोकरी लागेल, यशस्वी आयुष्य जगू शकेन. एक मन म्हणत मी जावं, एक मन म्हणत नको. काय करू?’

प्राजक्ताला घ्यावा लागणार होता, असे आणि यापेक्षा महत्वाचे निर्णय आपल्याला आयुष्यात घ्यावे लागतात. आणि अशा वेळेस समोर असणार्‍या पर्यायांमधून एक आपल्याला निवडायचा असतो. कारण दोन्ही पर्यायातील नकारात्मक आणि सकारात्मक मुद्द्यांमध्ये चढाओढ चालू झालेली असते. आणि मग मन चंचल बनतं. अशा अस्थिर अवस्थेत निर्णय घेतल्यावर विपरीत परिणाम सामोरे येणार हे निश्चितच असते. तसेही आपल्याला निर्णय हा घ्यायचा असतोच, तर मग स्थिर व शांत मनाने का घेऊ नये?

जेंव्हा आपल्याला जलद व योग्य निर्णय घ्यायचे असतात तेंव्हा विचारांना नेमकी दिशा दिल्यास मनाला स्थैर्य येऊ शकते. आणि मग मन नेमका कौल देऊन निर्णयासाठी मदत करते.

निर्णय घेण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात. सर्वात आधी, प्रत्येक निर्णय म्हणजे शिकण्याची नवी संधी. एकदा निर्णय घेतला कि त्यावर ठाम राहणं. कारण त्याला फाटे फोडत राहिलो तर निर्णय घेणं तर होतच नाही पण अस्वस्थता वाढत जाते.

दर वेळेस आपले निर्णय शंभर टक्के बरोबर असतीलच हे गरजेचे नाही, पण त्यातून जी परिस्थिती समोर येते तिला कसं हाताळावं, त्यात आपल्याला हवे तसे अनुकूल बदल कसे घडवून आणावेत हे शिकणं होतं. निर्णय घेताना मन अंतज्र्ञानी असण्यापेक्षा स्थिर व स्वतर्‍शी प्रामाणिक असणं गरजेचं असतं. कारण आपण जर घेतलेल्या निर्णयाला फाटे फोडत राहिलो तर आपले आत्तापर्यंतचे अनुभव, मिळालेले ज्ञान, आपल्या संवेदनातून मिळणारे ज्ञान, व भविष्यात काय घडू शकते याबद्दलची कल्पना असूनदेखील मन नेमकेपणाने निर्णय घेऊ शकत नाही.

अशा पद्धतीने विचारानं नेमक्या दिशेने वळवल्यास दोन पर्यायातील एक पर्याय निवडून त्यावर काम करणं सहज होतं व मानिसक स्थैर्य राहतं. तसेच कृतीला निश्चितता येते.

(लेखिका समुपदेशक आहेत )