शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नोकरी करु की शिक्षण पूर्ण करु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 16:32 IST

हातातली नोकरी सोडून पुढे शिकावं का, असा टप्पा आला तर?

ठळक मुद्देनिर्णय कुठलाही घेतला तरी फायदे तोटे आहेतच, आपली प्रायॉरिटी काय हे आपण ठरवायचं.

- योगिता तोडकर 

प्राजक्ता माझ्याकडे आलीच गंभीर चेहर्याने. 27 वर्षाची चुणचुणीत प्राजक्ता नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करत होती. तिला पीएचडीसाठी परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला होता व शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. ती म्हणाली, ‘चांगली नोकरी सोडून मी पीएचडीचा विचार करावा का, की नोकरीच चालू ठेवावी, कळतच नाहीये. जर मी जायचं ठरवलं तर माझ्या वैयिक्तक, कौटुंबिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील, पण पीएचडी नंतर चांगली नोकरी लागेल, यशस्वी आयुष्य जगू शकेन. एक मन म्हणत मी जावं, एक मन म्हणत नको. काय करू?’

प्राजक्ताला घ्यावा लागणार होता, असे आणि यापेक्षा महत्वाचे निर्णय आपल्याला आयुष्यात घ्यावे लागतात. आणि अशा वेळेस समोर असणार्‍या पर्यायांमधून एक आपल्याला निवडायचा असतो. कारण दोन्ही पर्यायातील नकारात्मक आणि सकारात्मक मुद्द्यांमध्ये चढाओढ चालू झालेली असते. आणि मग मन चंचल बनतं. अशा अस्थिर अवस्थेत निर्णय घेतल्यावर विपरीत परिणाम सामोरे येणार हे निश्चितच असते. तसेही आपल्याला निर्णय हा घ्यायचा असतोच, तर मग स्थिर व शांत मनाने का घेऊ नये?

जेंव्हा आपल्याला जलद व योग्य निर्णय घ्यायचे असतात तेंव्हा विचारांना नेमकी दिशा दिल्यास मनाला स्थैर्य येऊ शकते. आणि मग मन नेमका कौल देऊन निर्णयासाठी मदत करते.

निर्णय घेण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात. सर्वात आधी, प्रत्येक निर्णय म्हणजे शिकण्याची नवी संधी. एकदा निर्णय घेतला कि त्यावर ठाम राहणं. कारण त्याला फाटे फोडत राहिलो तर निर्णय घेणं तर होतच नाही पण अस्वस्थता वाढत जाते.

दर वेळेस आपले निर्णय शंभर टक्के बरोबर असतीलच हे गरजेचे नाही, पण त्यातून जी परिस्थिती समोर येते तिला कसं हाताळावं, त्यात आपल्याला हवे तसे अनुकूल बदल कसे घडवून आणावेत हे शिकणं होतं. निर्णय घेताना मन अंतज्र्ञानी असण्यापेक्षा स्थिर व स्वतर्‍शी प्रामाणिक असणं गरजेचं असतं. कारण आपण जर घेतलेल्या निर्णयाला फाटे फोडत राहिलो तर आपले आत्तापर्यंतचे अनुभव, मिळालेले ज्ञान, आपल्या संवेदनातून मिळणारे ज्ञान, व भविष्यात काय घडू शकते याबद्दलची कल्पना असूनदेखील मन नेमकेपणाने निर्णय घेऊ शकत नाही.

अशा पद्धतीने विचारानं नेमक्या दिशेने वळवल्यास दोन पर्यायातील एक पर्याय निवडून त्यावर काम करणं सहज होतं व मानिसक स्थैर्य राहतं. तसेच कृतीला निश्चितता येते.

(लेखिका समुपदेशक आहेत )