शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जि.प. विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या; टक्केवारीची अडचण

By admin | Updated: May 26, 2017 20:05 IST

बुलडाणा : जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापण होवून तीन महिन्यांच्या कालावधी उलटला असला तरी अद्याप विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापण होवून तीन महिन्यांच्या कालावधी उलटला असला तरी अद्याप विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. विषय समित्यांची नियुक्ती रखडल्यामुळे अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात अडचणी येत आहेत.जिल्हा परिषदमध्ये फेबु्रवारी महिन्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापण केली. सत्ता स्थापनेनंतर सभापतींचीही निवड झाली आहे. मात्र, विषय समित्या अद्याप स्थापण करण्यात आल्या नाहीत. जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापण व स्वच्छता, बांधकाम समिती, वित्त समिती, शालेय शिक्षण व क्रीडा समिती, महिला बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती, पशू संवर्धन व दुग्धशाळा समिती अशाप्रकारे विषय समित्या आहेत. या समित्यांमध्ये जिल्हा परिषदच्या सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सर्वपक्षीय सदस्यांची निवड करावी लागते. यापैकी समाजकल्याण समितीतच केवळ बहूसंख्य अनुसूचित जातीमधील सदस्यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेत २० लाख रूपयांच्या विकासकामांचे अधिकार अधिकाऱ्यांना असतात. त्यानंतर २० ते ५० लाखा पर्यंतच्या विकास कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थायी समितीला असतात, त्यानंतर ५० लाखांपेक्षा जास्त मंजुरीचे अधिकार सर्वसाधारण सभेला असतात. जिल्हा परिषद स्थापण होवून तीन महिने झाले असले तरी अद्याप विषय समित्या गठीत करण्यात आल्या नाहीत.आतापर्यंत विषय समित्यांचीच निवड करण्यात आली नसल्यामुळे विविध कामांना मंजुरी मिळण्यात अडचणी येत आहेत. आगामी महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे. कृषि विभागाच्या अनेक योजना असतात. या योजनांना विषय समित्यांची मंजुरी आवश्यक असते. विषय समितीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतरही सदर निधी प्राप्त होणे व प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता २० ते २५ दिवसांचा अवधी लागतो. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे योजनांना मंजुरी मिळणे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याला विलंब होणार आहे.विषय समित्यांची तीस दिवसांच्या आत सभा आवश्यकविषय समित्यांची दर महिन्याला तीस दिवसांच्या आत सभा होणे आवश्यक आहे. त्यामुळे दर महिन्याला समित्यांपूढे आलेल्य विषयांना त्वरीत मंजुरी मिळू शकते. मात्र, बुलडाणा जिल्हा परिषदेत तीन महिन्यांपासून समितीच गठीत करण्यात आली नसल्यामुळे अजून एकही बैठक घेण्यात आली नाही.जिल्हा परिषदेत अद्याप विषय समित्यांची निवड झाली आहे. त्यामुळे विकासकामांच्या मंजुरीला विलंब होत आहे. जि.प. सत्ताधाऱ्यांना सर्वांचा समोवश करीत लवकरात लवकर विषय समित्यांची निवड करायला हवी.- संतोष पाटील, विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद, बुलडाणा