शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

जि.प. विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या; टक्केवारीची अडचण

By admin | Updated: May 26, 2017 20:05 IST

बुलडाणा : जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापण होवून तीन महिन्यांच्या कालावधी उलटला असला तरी अद्याप विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापण होवून तीन महिन्यांच्या कालावधी उलटला असला तरी अद्याप विषय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. विषय समित्यांची नियुक्ती रखडल्यामुळे अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात अडचणी येत आहेत.जिल्हा परिषदमध्ये फेबु्रवारी महिन्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापण केली. सत्ता स्थापनेनंतर सभापतींचीही निवड झाली आहे. मात्र, विषय समित्या अद्याप स्थापण करण्यात आल्या नाहीत. जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापण व स्वच्छता, बांधकाम समिती, वित्त समिती, शालेय शिक्षण व क्रीडा समिती, महिला बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती, पशू संवर्धन व दुग्धशाळा समिती अशाप्रकारे विषय समित्या आहेत. या समित्यांमध्ये जिल्हा परिषदच्या सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सर्वपक्षीय सदस्यांची निवड करावी लागते. यापैकी समाजकल्याण समितीतच केवळ बहूसंख्य अनुसूचित जातीमधील सदस्यांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेत २० लाख रूपयांच्या विकासकामांचे अधिकार अधिकाऱ्यांना असतात. त्यानंतर २० ते ५० लाखा पर्यंतच्या विकास कामांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थायी समितीला असतात, त्यानंतर ५० लाखांपेक्षा जास्त मंजुरीचे अधिकार सर्वसाधारण सभेला असतात. जिल्हा परिषद स्थापण होवून तीन महिने झाले असले तरी अद्याप विषय समित्या गठीत करण्यात आल्या नाहीत.आतापर्यंत विषय समित्यांचीच निवड करण्यात आली नसल्यामुळे विविध कामांना मंजुरी मिळण्यात अडचणी येत आहेत. आगामी महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे. कृषि विभागाच्या अनेक योजना असतात. या योजनांना विषय समित्यांची मंजुरी आवश्यक असते. विषय समितीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतरही सदर निधी प्राप्त होणे व प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता २० ते २५ दिवसांचा अवधी लागतो. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे योजनांना मंजुरी मिळणे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याला विलंब होणार आहे.विषय समित्यांची तीस दिवसांच्या आत सभा आवश्यकविषय समित्यांची दर महिन्याला तीस दिवसांच्या आत सभा होणे आवश्यक आहे. त्यामुळे दर महिन्याला समित्यांपूढे आलेल्य विषयांना त्वरीत मंजुरी मिळू शकते. मात्र, बुलडाणा जिल्हा परिषदेत तीन महिन्यांपासून समितीच गठीत करण्यात आली नसल्यामुळे अजून एकही बैठक घेण्यात आली नाही.जिल्हा परिषदेत अद्याप विषय समित्यांची निवड झाली आहे. त्यामुळे विकासकामांच्या मंजुरीला विलंब होत आहे. जि.प. सत्ताधाऱ्यांना सर्वांचा समोवश करीत लवकरात लवकर विषय समित्यांची निवड करायला हवी.- संतोष पाटील, विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद, बुलडाणा