शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: July 11, 2017 00:01 IST

विद्यार्थी शोधमोहीम सुरू : शिक्षक अडचणीत, अतिरिक्त होण्याची भीती

किशोर मापारी। लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्यावर फिरून विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये दाखल करण्याकडे अधिक कल दिसत आहे. यामुळे नामवंत व गुणवान उच्चपदस्थ विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मागिल काही वर्षात आपल्या मुलांनाही शहरातील मुलांप्रमाणे इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे, या शिक्षणाच्या धावत्या युगात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत असायला पाहिजे, म्हणून ग्रामीण भागातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून मुले ज्या शहरात शिक्षण घेत आहेत, त्याच शहरात राहून मोलमजुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही डिजिटल होण्याकडे कल असतानाही अनेक शाळांना विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे दिसून येते. वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांची विद्यार्थी शोध मोहीम सुरू आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडीची मान्यता रद्द होण्याची भीती असते. परिणामी, काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा मोठा धोका हा या शिक्षकांवर ओढावू शकतो. एकेकाळी जिल्हा परिषद शिक्षकाला संपूर्ण गाव आदर्श मानून त्यांना मोठा सन्मान देत होते. काळाच्या ओघात नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात दारोदार फिरण्याची वेळ आता याच शिक्षकांवर आली आहे, तर ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे पालक मात्र ग्रामीण भागातीलच शाळेत पाल्यांना ठेवण्यासाठी आग्रही आहेत; पण येथील शाळांना हे विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे या शाळांचेच आता अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय व स्वच्छतागृहांचा अभाव असून, शाळांचे कुंपण गायब झाले आहे. त्यामुळे जनावरे शाळेच्या परिसरात मुक्त संचार करताना दिसून येतात. डागडुजीअभावी अनेक शाळांच्या भिंती पडण्याच्या स्थितीत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.-राजेश मापारी, जिल्हा परिषद सदस्य, लोणार.