शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा - गजानन शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 19:33 IST

धाड : आजच्या तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात सतत संघर्ष करून धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी बलीदान दिले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे संभाजी राजे घडले. त्यांचे चरित्राचा सखोल अभ्यासासह त्यांचा आदर्श आजच्या तरूणांनी घेण्याचे आवाहन प्रसिध्द व्याख्याते गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६० व्या जयंती पर्वावर धाडमध्ये बोराडे नगरात राजे संभाजी मित्र मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पोलिस ठाणेदार संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. गजानन दादा शास्त्री यांनी आपल्या कणखर आवाजात सुरूवातीला संभाजी महाराजांचा पोवाडा सादर करून तरूणांना मंत्रमुग्ध केले. आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, आपल्या बालवयातच स्वराज्याची आणि धर्माची धुरा संभाजी महाराजांनी सांभाळत अनेक शत्रुंशी ते एकाचवेळी सतत लढा दिला. सोबतच धर्म, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारण, युध्द या चौफेर विषयावर गाढा अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रावर त्यांची पकड होती. विपरीत परिस्थितीत रयतेची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचा विस्तार करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या मनोगतातून तरूणांनी व्यसनाधिनता सोडून शरीर बळकट बनवून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाहीर प्रमोद दांडगे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी गावातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक तरूणांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली. संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष उबाळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सर्जेराव देशमुख तर आभार तायडे गुरूजी यांनी केले.