शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खरिपाच्या लागवड क्षेत्रात ३१६ हेक्टरने होणार वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी ...

सुधीर चेके पाटील

चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी कृषी विभाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. विभागाने यंदा तालुक्यातील ८८ हजार ६१० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले असल्याने यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने ३१६ हेक्टरवर क्षेत्राचे अतिरिक्त नियोजन देखील करण्यात आले आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणवणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ५०० हेक्टरवर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत या नियोजनातून मिळत आहेत.

मका पिकाकडे पाठ !

खरिपातील मका पिकास मिळणारा अत्यल्प भाव व नुकसान यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील मका पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट दिसून येत आहे. सन २०१८ मध्ये १ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या मक्याची २०१९ मध्ये केवळ २५० हेक्टरपर्यंत लागवड झाली होती, तर २०२० मध्ये २१० हेक्टर याप्रमाणे सातत्याने मक्याचे क्षेत्र घटत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानेही यंदा देखील केवळ २५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे नियोजन केले आहे.

इतर पिकांचे नियोजन

सोयाबीनचे प्रमुख पीक वगळता संकरित ज्वारी ८० हेक्टर, बाजरी ५, भुईमुगाची ५० हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे, तर सूर्यफूल, तीळ, आदी तेलबियांच्या क्षेत्रात कमालीची घट झालेली असल्याने केवळ ५ हेक्टर इतर तेलबियांचे नियोजन करण्यात आले आहे. इतर कडधान्याचे क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत राहणार आहे.

घरच्या बियाण्यांचा होणार वापर !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरीच बियाणे काढून ठेवल्याचे दिसत आहे. संभाव्य पीक पेऱ्यानुसार बियाण्यांची आवश्यक पाहता सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ६९ हजार १५९ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याने यंदा बियाण्यांची कमतरता भासणार नाही.