शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

यंदा खरिपाच्या लागवड क्षेत्रात ३१६ हेक्टरने होणार वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

सुधीर चेके पाटील चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी ...

सुधीर चेके पाटील

चिखली : सध्या सर्वत्र कोरोनाची आपत्ती असली तरी या आपत्ती काळातही खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी कृषी विभाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. विभागाने यंदा तालुक्यातील ८८ हजार ६१० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले असल्याने यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने ३१६ हेक्टरवर क्षेत्राचे अतिरिक्त नियोजन देखील करण्यात आले आहे.

तालुक्यात सुमारे ९० हजार हेक्टर लागवडीलायक क्षेत्र आहे. यापैकी सरासरी पेरणी क्षेत्र हे ८८ हजार ४२३ आहे. गतवर्षी ८८ हजार २९४ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. दरम्यान, गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. या पृष्ठभूमीवर यंदा पावसाने तालुक्याची सरासरी गाठली तरी पाण्याची कमतरता जाणवणारी नसल्याने यंदाच्या हंगामात खरिपाच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने यंदा ८८ हजार ६१० हेक्टरावर पेरणीचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही एकूण लागवडी क्षेत्रापैकी तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ५०० हेक्टरवर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मूग या प्रमुख पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे संकेत या नियोजनातून मिळत आहेत.

मका पिकाकडे पाठ !

खरिपातील मका पिकास मिळणारा अत्यल्प भाव व नुकसान यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील मका पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट दिसून येत आहे. सन २०१८ मध्ये १ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या मक्याची २०१९ मध्ये केवळ २५० हेक्टरपर्यंत लागवड झाली होती, तर २०२० मध्ये २१० हेक्टर याप्रमाणे सातत्याने मक्याचे क्षेत्र घटत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानेही यंदा देखील केवळ २५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचे नियोजन केले आहे.

इतर पिकांचे नियोजन

सोयाबीनचे प्रमुख पीक वगळता संकरित ज्वारी ८० हेक्टर, बाजरी ५, भुईमुगाची ५० हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे, तर सूर्यफूल, तीळ, आदी तेलबियांच्या क्षेत्रात कमालीची घट झालेली असल्याने केवळ ५ हेक्टर इतर तेलबियांचे नियोजन करण्यात आले आहे. इतर कडधान्याचे क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत राहणार आहे.

घरच्या बियाण्यांचा होणार वापर !

गतवर्षी लॉकडाऊनमुळे ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन या प्रमुख पिकासाठी घरीच बियाणे काढून ठेवल्याचे दिसत आहे. संभाव्य पीक पेऱ्यानुसार बियाण्यांची आवश्यक पाहता सुमारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ६९ हजार १५९ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याने यंदा बियाण्यांची कमतरता भासणार नाही.